शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे नवे संकट

By admin | Updated: June 5, 2015 01:12 IST

शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे.

बेजबाबदारपणा : रिडिंग न घेताच कृषिपंपाच्या बिलात अधिकचा भुर्दंडनांदाफाटा: शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग न घेताच विजेचे भरमसाठ बिल पाठवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भरणा करावा लागत असून अचानक आलेल्या अधिकच्या बिलामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे शेतकऱ्यांपुढे नवेच संकट निर्माण झाले आहे.आधुनिक शेतीच्या दृष्टीने व निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर अथवा बोअरवेलच्या माध्यमातून शेतकरी पाणी पुरवठा करीत आहे. यासाठी हजारो रुपये खर्च करुन विद्युत मीटर व कृषीपंप बसविण्यात आले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे जितकी विद्युत वापरता येईल, त्यानुसार विद्युत कर आकारण्याचे धोरण आहे. यासाठी प्रत्येक गावात मीटरची रिडिंग घेणे गरजेचे आहे. मात्र रिडिंग घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी कार्यालयातूनच अंदाजवार खर्ची विद्युत आकडे नोंदवून बिले तयार करीत आहे. उन्हामुळे अनेक शेतकरी कृषीपंपांचा वापर शेतात करीत नाही. केवळ भाजीपाला पिके घेणारे काही शेतकरीच कृषीपंपाचा पाणी पुरवठ्यासाठी वापर करताना दिसतात. त्यामुळे असे शेतकरी वगळता इतरही शेतकऱ्यांना त्यांच्याप्रमाणे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत बिले विद्युत वितरण कंपनीमार्फत पाठविण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पादनात बरीच घट झाली आहे. यातच शेतकऱ्यांना अतिपावसामुळे दुबार- तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यासाठी सुरुवातीलाच बियाणांचा खर्च अधिक लागला. हंगामात तर उत्पादन हाती आले. मात्र पाहिजे तो भाव पिकाला मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही भरुन निघालेला नाही. अशा परिस्थितीत येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यातच आता कृषीपंपाची बिले येत असलेल्या ती कशी भरावी या चिंतेत शेतकरी आहे. अनेक शेतातील कृषीपंपाचे मीटर बंद अवस्थेत असल्याचेही समजते. याबाबत काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रारी दिल्या आहे.परंतु अद्यापही मीटर बदलवून वा नवीन मीटर शेतकऱ्यांना बसवून देण्याचे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसत आहे. कृषीपंपाचा वापर नसताना शेतकऱ्यांना किमान बिल येईल, अशी अपेक्षा असते. परंतु जादा बिलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. (वार्ताहर)