शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे नवे संकट

By admin | Updated: June 5, 2015 01:12 IST

शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे.

बेजबाबदारपणा : रिडिंग न घेताच कृषिपंपाच्या बिलात अधिकचा भुर्दंडनांदाफाटा: शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग न घेताच विजेचे भरमसाठ बिल पाठवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भरणा करावा लागत असून अचानक आलेल्या अधिकच्या बिलामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे शेतकऱ्यांपुढे नवेच संकट निर्माण झाले आहे.आधुनिक शेतीच्या दृष्टीने व निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर अथवा बोअरवेलच्या माध्यमातून शेतकरी पाणी पुरवठा करीत आहे. यासाठी हजारो रुपये खर्च करुन विद्युत मीटर व कृषीपंप बसविण्यात आले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे जितकी विद्युत वापरता येईल, त्यानुसार विद्युत कर आकारण्याचे धोरण आहे. यासाठी प्रत्येक गावात मीटरची रिडिंग घेणे गरजेचे आहे. मात्र रिडिंग घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी कार्यालयातूनच अंदाजवार खर्ची विद्युत आकडे नोंदवून बिले तयार करीत आहे. उन्हामुळे अनेक शेतकरी कृषीपंपांचा वापर शेतात करीत नाही. केवळ भाजीपाला पिके घेणारे काही शेतकरीच कृषीपंपाचा पाणी पुरवठ्यासाठी वापर करताना दिसतात. त्यामुळे असे शेतकरी वगळता इतरही शेतकऱ्यांना त्यांच्याप्रमाणे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत बिले विद्युत वितरण कंपनीमार्फत पाठविण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पादनात बरीच घट झाली आहे. यातच शेतकऱ्यांना अतिपावसामुळे दुबार- तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यासाठी सुरुवातीलाच बियाणांचा खर्च अधिक लागला. हंगामात तर उत्पादन हाती आले. मात्र पाहिजे तो भाव पिकाला मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही भरुन निघालेला नाही. अशा परिस्थितीत येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यातच आता कृषीपंपाची बिले येत असलेल्या ती कशी भरावी या चिंतेत शेतकरी आहे. अनेक शेतातील कृषीपंपाचे मीटर बंद अवस्थेत असल्याचेही समजते. याबाबत काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रारी दिल्या आहे.परंतु अद्यापही मीटर बदलवून वा नवीन मीटर शेतकऱ्यांना बसवून देण्याचे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसत आहे. कृषीपंपाचा वापर नसताना शेतकऱ्यांना किमान बिल येईल, अशी अपेक्षा असते. परंतु जादा बिलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. (वार्ताहर)