शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नीडोनाॅमिक्सने कोरोनाकाळातील आर्थिक संकटावरही मात करता येणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही ...

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही असायला हवी. आपली गरज लक्षात घेऊन खर्च केला तर कोरोनासारख्या संकटावरही मात करता येणे सहज शक्य आहे, असे विचार कुरुक्षेत्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आवश्यकतावादी अर्थशास्त्र सिद्धान्ताचे जनक (नीडोनॉमिक्स) डाॅ. एम. एम. गोयल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

येथील जनता महाविद्यालयात नॅक समितीचे सदस्य अध्यक्ष म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सेवानिवृत्त प्राध्यापक मोहम्मद अकबर खूर होते. भारतासह जगातील कोणत्याही देशातील आर्थिक व गैरआर्थिक समस्यांचे समाधान आवश्यकतावादी अर्थशास्त्रात आहे. यासोबतच हिंसा, आतंकवाद, शोषण, भेदभाव, असंतोष आणि समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारासह अपेक्षा यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांवर ‘आवश्यकतावादी अर्थशास्त्र’ हे रामबाण उपाय आहे, असेही डाॅ. गाेयल म्हणाले. या वेळी त्यांनी भगवत् गीतेतील उदाहरणे सांगितली.

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीला कोणीही नाकारू शकत नाही. हे सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नैतिक व्यवहारातून यावर मात करता येणे शक्य आहे. यासाठी उपभोक्ता, उत्पादक, व्यापारी तसेच सर्व निर्मातांसह सुविधांचा उपभोग करणाऱ्यांनी भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा नेमकी गरज पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. बाजारात १० रुपयांची वस्तू आहे. आणि तीच वस्तू महागडीपण आहे. केवळ ब्रॅण्ड व्हॅल्यू लक्षात घेऊन महागडी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु ती वस्तू आणि तिची किंमत यामध्ये ताळमेळ बसतो काय, हे ती वस्तू खरेदी करताना विचारात घेणे म्हणजेच आवश्यकतावादी अर्थशास्त्र आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा भारतच नव्हेतर, जगातील सर्व देशांना आर्थिक मंदीवर मात करून आपली अर्थव्यवस्था सुरळीत करता येणे शक्य आहे, याकडे डाॅ. गोयल यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. एम. सुभाष, डाॅ. एन. आर. बेग, डाॅ. अनिता हुडा, डाॅ. इम्यनुएल कोंड्रा, प्रा. रवी वरारकर उपस्थित होते.