शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नीडोनाॅमिक्सने कोरोनाकाळातील आर्थिक संकटावरही मात करता येणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही ...

चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही असायला हवी. आपली गरज लक्षात घेऊन खर्च केला तर कोरोनासारख्या संकटावरही मात करता येणे सहज शक्य आहे, असे विचार कुरुक्षेत्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आवश्यकतावादी अर्थशास्त्र सिद्धान्ताचे जनक (नीडोनॉमिक्स) डाॅ. एम. एम. गोयल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

येथील जनता महाविद्यालयात नॅक समितीचे सदस्य अध्यक्ष म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सेवानिवृत्त प्राध्यापक मोहम्मद अकबर खूर होते. भारतासह जगातील कोणत्याही देशातील आर्थिक व गैरआर्थिक समस्यांचे समाधान आवश्यकतावादी अर्थशास्त्रात आहे. यासोबतच हिंसा, आतंकवाद, शोषण, भेदभाव, असंतोष आणि समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारासह अपेक्षा यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांवर ‘आवश्यकतावादी अर्थशास्त्र’ हे रामबाण उपाय आहे, असेही डाॅ. गाेयल म्हणाले. या वेळी त्यांनी भगवत् गीतेतील उदाहरणे सांगितली.

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीला कोणीही नाकारू शकत नाही. हे सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नैतिक व्यवहारातून यावर मात करता येणे शक्य आहे. यासाठी उपभोक्ता, उत्पादक, व्यापारी तसेच सर्व निर्मातांसह सुविधांचा उपभोग करणाऱ्यांनी भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा नेमकी गरज पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. बाजारात १० रुपयांची वस्तू आहे. आणि तीच वस्तू महागडीपण आहे. केवळ ब्रॅण्ड व्हॅल्यू लक्षात घेऊन महागडी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु ती वस्तू आणि तिची किंमत यामध्ये ताळमेळ बसतो काय, हे ती वस्तू खरेदी करताना विचारात घेणे म्हणजेच आवश्यकतावादी अर्थशास्त्र आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा भारतच नव्हेतर, जगातील सर्व देशांना आर्थिक मंदीवर मात करून आपली अर्थव्यवस्था सुरळीत करता येणे शक्य आहे, याकडे डाॅ. गोयल यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. एम. सुभाष, डाॅ. एन. आर. बेग, डाॅ. अनिता हुडा, डाॅ. इम्यनुएल कोंड्रा, प्रा. रवी वरारकर उपस्थित होते.