शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

निंबाळावासीयांच्या समस्यांकडे शासनाचेही दुर्लक्ष

By admin | Updated: December 23, 2015 01:23 IST

येथून जवळच असलेल्या घोट-निंबाळा-हेटी ही गट ग्रामपंचायत असून या गावांतील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे.

बेरोजगारांची फौज : नळयोजनेअभावी पाण्यासाठी पायपीटघोडपेठ : येथून जवळच असलेल्या घोट-निंबाळा-हेटी ही गट ग्रामपंचायत असून या गावांतील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र नागरिकांच्या समस्यांकडे शासकिय यंत्रणेचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.शेती करून आपले कुटूंब जगविणे हा येथील नागरिकांचा व्यवसाय आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेले येथील शेतकरी बांधव जवळच्याच आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये रोजंदारीने जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीवर जगायचे कसे, हा येथील नागरिकांसमोरचा मोठा प्रश्न आहे.भद्रावती येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत एकही प्रकल्प न आल्याने परिसरातील सुशिक्षित युवकांना बेरोजगारीचे जिणे जगावे लागत आहे.गावात सरकारी नळयोजना नसल्याने महिलांना विहीरीचे पाणी काढून आपली तहान भागवावी लागते. या विहीरीतील पाणी पावसाळ्यात गढूळ असते, तर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बरेचदा विहीरीला पाणी नसते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा येथील महिलांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.विजेच्या बाबतीतही हे गाव दुर्दैवीच ठरले आहे. येथील विजपुरवठा सतत खंडीत होत असतो. पावसाळ्याच्या दिवसांत बरेचदा या गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने मोकळ्या जागेत आणि रस्त्यांवरच नागरिकांना कचरा टाकावा लागत आहे. महामार्गावरून निंबाळा हे गाव अंदाजे दोन किलोमिटर आतमध्ये आहे. मात्र या गावात जाणारा रस्ता हा पूर्णपणे उखडला असून या रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. तसेच प्राथमिक शिक्षणानंतर गावात शिकण्याची सोय नसल्याने शिक्षणासाठी घोडपेठ किंवा भद्रावतीला जाणा-या विद्यार्थ्यांनासुध्दा याच रस्त्याने जाणे - येणे करावे लागत असल्याने नादुरूस्त रस्त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास उपचारासाठी घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. महामागार्पासून लांब असल्याने अचानक रात्री लहान बालके किंवा वृध्द नागरिकांची प्रकृती बिघडल्यास दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.गावात अजुनपर्यंत महामंडळाच्या बसची सेवा पोहोचली नसल्याने नागरिकांना निंबाळा ते महामार्ग हा अंदाजे दोन किलोमिटरचा रस्ता पायी चालत जावे लागते. मात्र, महामार्गावर या गावातील नागरिकांसाठी बसस्थानकच नसल्याने प्रवाशांना उन्ह पावसात ताटकळत उभे रहावे लागते. महामार्ग चौपदरीकरणात जुने असलेले बसस्थानक तोडण्यात आले. मात्र नवीन बसस्थानक बांधण्यात आले नाही. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेवून भद्रावती येथील गौतम गेडेकर यांनी बसस्थानक बांधण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)