शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदी मनरेगाचा पैसा घेऊन पळाले, राहुल गांधी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:11 IST

नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.

- राजेश भोजेकर/ घनश्याम नवघडे नांदेड (जि.चंद्रपूर) : नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.एचएमटी तांदळाचे जनक, कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी आले होते. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला ३५ हजार कोटी दिले. यातील पाच कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकºयांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असा टोला त्यांनी लागावला. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकºयांच्या खिशात टाकू, असे आश्वासनही त्यांनी दिले.राहुल म्हणाले, गरिबांबद्दल कळवळा आहे म्हणूनच येथे आलो. आमचे सरकार सत्तेवर येताच पंजाब, कर्नाटकमधील शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. ते शेतकºयांचे कर्ज माफ करणार नाही. मोदींचे मार्केटिंग १५-२० उद्योगपती करतात. या लोकांना मोदींनी सांगितले होते की, सत्तेवर आलो तर मी तुम्हाला कर्जमुक्त करेल. त्याप्रमाणे ते वागत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत, प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले आदी उपस्थित होते.खोब्रागडे कुटुंबीयांशी साधला हृद्य संवादराहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दादाजींनी तांदळाच्या नवनवीन वाणाच्या संशोधनासाठी आपले अख्खे आयुष्य वेचले. पण त्यांचे कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत असल्याचे पाहून ते भावूक झाले होते.दादाजींचा मुलगा मित्रजीत यांनी दादाजींचे संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी शंभर एकर शेती, शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी, दादाजींना मरणोपरांत भारतरत्न मिळावा, ही इच्छा बोलून दाखविली. त्यावर आ. विजय वडेट्टीवार यांनी अडीच लाखांचा धनादेश दिला, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच लाखांचा धनादेश पोहचता करण्याची ग्वाही दिली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एक लाख रुपये व कुटुंबातील एकाला नोकरी देऊ असे सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस