शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नागभीडचा कायापालट करण्याची गरज

By admin | Updated: June 27, 2017 00:44 IST

नागपूरचे आयुक्त असताना टी. चंद्रशेखर यांनी जी धडाडी दाखवून नागपूरचा कायापालट केला,

अतिक्रमण वाढले : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरवावाघनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागपूरचे आयुक्त असताना टी. चंद्रशेखर यांनी जी धडाडी दाखवून नागपूरचा कायापालट केला, त्याला तोड नाही. नागभीड ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यानंतर नागभीडचे स्वरूप बदलवायचे असेल तर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरविण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया आता येथे व्यक्त होऊ लागल्या आहेत.नागभीड नगरपरिषदेचा थोडा जरी विचार डोळ्यासमोर आणला तर नागभीडमध्ये प्रत्येक समस्या आवासून उभी आहे. तत्कालीन ग्रा.पं.च्या निष्काळजीपणामुळे या समस्यांनी आता उग्र रुप धारण केले ,असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. येथील वाढते अतिक्रमण आता नागभीडचा गळा घोटू पाहात आहेत. येथे पाण्याची समस्या आहे. जड वाहतुकीची समस्या आहे. येथे रस्त्यांची समस्या आहे. लाईट व्यवस्थेची समस्या आहे. यासोबत आणखी अनेक समस्या अनेक वर्षांपासून सुटू शकल्या नाहीत. नागभीडमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील ज्या काही समस्या असतील, त्यांची यादी वेगळीच आहे.एका दिवशी किंवा एका वर्षात या सर्वच समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षाही कोणी व्यक्त करणार नाही. पण त्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा कोणी व्यक्त केली तर ते चुकीचेही ठरणार नाही. लोकशाहीतील लोकप्रतिनिधींची एकंदर मानसिकता लक्षात घेतली तर या लोकशाहीतील प्रतिनिधींना समस्येशी संबंध असणारा कोणी ना कोणी जवळचा असतो. त्याने आपल्याला मदत केली होती. मी त्याचे वाईट कसे करु, या भावनेने काही लोकप्रतिनिधी निष्प्रभ ठरत आले आहेत. यातून एका नव्या समस्येचा आणखी जन्म होतो आणि नेमक्या याच विचारधारेतून नागभीडभोवती समस्यांचा विळखा निर्माण झाला आहे. आता या समस्याचे निरसन करण्याचे आव्हान नागभीड नगर परिषदेच्या नवीन मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्या समोर आहे. वासनकर यांनी पुढाकार घेवून नागभीडच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले, मुख्य रस्त्यांची निर्मिती केली आणि शहरातून होत असलेली जडवाहतूक बंद केली तरी नागभीड मोकळा श्वास घेईल. वासनकर यांना हे करीत असताना काही प्रमाणात आडकाडी येईलही. पण टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरवून त्यांनी हे करावे, अशी अपेक्षा आहे.लोकप्रतिनिधींचाही पुढाकार महत्त्वाचानुसत्या वासनकर यांनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशातलाही हा भाग नाही. नागभीड नगपरिषदेच्या ज्या-ज्या लोकप्रतिनिधींच्या सद्सदविवेकबुद्धीला हे पटते, त्या-त्या लोकप्रतिनिधींनी यासाठी मदत केली तरी हे पुरसे आहे. वास्तविक, समस्यांचा हा प्रश्न प्रशासकीय काळातच मार्गी लागावा, अशी येथील नागरिकांनी अपेक्षा होती. तसे झाले नाही. आता तरी मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी लोकप्रतिनिधीना सोबत घेऊन या समस्या निकाली काढाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.