शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

By admin | Updated: June 26, 2016 00:47 IST

तळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे...

कुणाच्या संमतीने झाले होते अतिक्रमण? : झारीतील ‘त्या’ शुक्राचार्यांवर कारवाई व्हावीघनश्याम नवघडे नागभीडतळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सोनटक्के यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करून इतर अधिकाऱ्यांनीही ही मोहीम राबविली तर वनविभागाच्या इतर अनेक जागेवर झालेले अतिक्रमण हटण्यास वेळ लागणार नाही.जमीन तीच आहे. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी २० एकराचा कास्तकार असलेल्या शेतकऱ्यांचे वारस आता अल्पभूधारक झाले आहेत. मात्र घरातील खाणाऱ्यांची तोंडे वाढल्याने एक वेगळीच चिंता या अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. या चिंतेतूनच अतिक्रमणाचे प्रकार घडत आहेत.अतिक्रमण ही त्या शेतकऱ्यांची गरज असली तरी कायदा मात्र कदापि हे माान्य करणार नाही. या कायद्याला बांधील राहूनच सोनटक्के यांनी पाऊल उचलले आहे. बोंड येथे वनविभागाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले अतिक्रमण ही काही एक- दोन दिवसातील गोष्ट निश्चितच नाही. महिना दोन महिने तर निश्चितच लागले असतील. मग या महिने दोन महिन्यात वनविभागात महत्त्वाचा दुवा असलेल्या येथील बीट गार्ड, क्षेत्र सहाय्यक हे काय करीत होते? हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.माहिती तर अशी आहे की हे अतिक्रमण एक-दोन नाही तर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. जवळपास ३१ हेक्टरवर हे अतिक्रमण करण्यात आले आहे. आणि ३१ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. हे अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपये खर्च केले आहेत. हे होत असताना बोंड बिटाचे वनरक्षक आणि क्षेत्र सहाय्यक वनविभागाची चाकरी करीत होते का? अन्य कोणाची, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत.तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये सोनटक्केंसारख्या जागरुक अधिकारी रुजू झाल्या आणि त्यांनी बारकाईने यात लक्ष घातले म्हणून हे प्रकरण उघड झाले नाही तर सारेच शेत कुंपणाने खाल्ले असते आणि म्हणूनच हे एवढ्यावरच न थांबविता या प्र्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ७० ते ८० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले ते कोणाच्या आशीर्वादाने हे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि यात जे खरोखरच दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.यातील दोषींवर ही कारवाई यासाठी की त्यांनी या अतिक्रमणास मज्जाव केला नाही. सोबतच ते लोकांच्या भावनेशीही खेळले. या जागेवर लोकांनी अतिक्रमण केल्यानंतर त्यांचे आणि या जागेचे एक नाते निर्माण झाले होते. या जागेच्या माध्यमातून त्यांनी उद्याची स्वप्ने रंगविली होती. पण आज त्यांच्या या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. वेळीच त्यांनी या अतिक्रमणास अटकाव केला असता तर अतिक्रमणधारकांवर ही अवस्था आली नसती आणि बोंड येथे जे वातावरण निर्माण झाले, ते वातावरण निर्माण झाले नसते, एवढे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.