शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

By admin | Updated: June 26, 2016 00:47 IST

तळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे...

कुणाच्या संमतीने झाले होते अतिक्रमण? : झारीतील ‘त्या’ शुक्राचार्यांवर कारवाई व्हावीघनश्याम नवघडे नागभीडतळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सोनटक्के यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करून इतर अधिकाऱ्यांनीही ही मोहीम राबविली तर वनविभागाच्या इतर अनेक जागेवर झालेले अतिक्रमण हटण्यास वेळ लागणार नाही.जमीन तीच आहे. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी २० एकराचा कास्तकार असलेल्या शेतकऱ्यांचे वारस आता अल्पभूधारक झाले आहेत. मात्र घरातील खाणाऱ्यांची तोंडे वाढल्याने एक वेगळीच चिंता या अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. या चिंतेतूनच अतिक्रमणाचे प्रकार घडत आहेत.अतिक्रमण ही त्या शेतकऱ्यांची गरज असली तरी कायदा मात्र कदापि हे माान्य करणार नाही. या कायद्याला बांधील राहूनच सोनटक्के यांनी पाऊल उचलले आहे. बोंड येथे वनविभागाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले अतिक्रमण ही काही एक- दोन दिवसातील गोष्ट निश्चितच नाही. महिना दोन महिने तर निश्चितच लागले असतील. मग या महिने दोन महिन्यात वनविभागात महत्त्वाचा दुवा असलेल्या येथील बीट गार्ड, क्षेत्र सहाय्यक हे काय करीत होते? हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.माहिती तर अशी आहे की हे अतिक्रमण एक-दोन नाही तर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. जवळपास ३१ हेक्टरवर हे अतिक्रमण करण्यात आले आहे. आणि ३१ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. हे अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपये खर्च केले आहेत. हे होत असताना बोंड बिटाचे वनरक्षक आणि क्षेत्र सहाय्यक वनविभागाची चाकरी करीत होते का? अन्य कोणाची, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत.तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये सोनटक्केंसारख्या जागरुक अधिकारी रुजू झाल्या आणि त्यांनी बारकाईने यात लक्ष घातले म्हणून हे प्रकरण उघड झाले नाही तर सारेच शेत कुंपणाने खाल्ले असते आणि म्हणूनच हे एवढ्यावरच न थांबविता या प्र्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ७० ते ८० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले ते कोणाच्या आशीर्वादाने हे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि यात जे खरोखरच दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.यातील दोषींवर ही कारवाई यासाठी की त्यांनी या अतिक्रमणास मज्जाव केला नाही. सोबतच ते लोकांच्या भावनेशीही खेळले. या जागेवर लोकांनी अतिक्रमण केल्यानंतर त्यांचे आणि या जागेचे एक नाते निर्माण झाले होते. या जागेच्या माध्यमातून त्यांनी उद्याची स्वप्ने रंगविली होती. पण आज त्यांच्या या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. वेळीच त्यांनी या अतिक्रमणास अटकाव केला असता तर अतिक्रमणधारकांवर ही अवस्था आली नसती आणि बोंड येथे जे वातावरण निर्माण झाले, ते वातावरण निर्माण झाले नसते, एवढे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.