शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

By admin | Updated: June 26, 2016 00:47 IST

तळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे...

कुणाच्या संमतीने झाले होते अतिक्रमण? : झारीतील ‘त्या’ शुक्राचार्यांवर कारवाई व्हावीघनश्याम नवघडे नागभीडतळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सोनटक्के यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करून इतर अधिकाऱ्यांनीही ही मोहीम राबविली तर वनविभागाच्या इतर अनेक जागेवर झालेले अतिक्रमण हटण्यास वेळ लागणार नाही.जमीन तीच आहे. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी २० एकराचा कास्तकार असलेल्या शेतकऱ्यांचे वारस आता अल्पभूधारक झाले आहेत. मात्र घरातील खाणाऱ्यांची तोंडे वाढल्याने एक वेगळीच चिंता या अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. या चिंतेतूनच अतिक्रमणाचे प्रकार घडत आहेत.अतिक्रमण ही त्या शेतकऱ्यांची गरज असली तरी कायदा मात्र कदापि हे माान्य करणार नाही. या कायद्याला बांधील राहूनच सोनटक्के यांनी पाऊल उचलले आहे. बोंड येथे वनविभागाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले अतिक्रमण ही काही एक- दोन दिवसातील गोष्ट निश्चितच नाही. महिना दोन महिने तर निश्चितच लागले असतील. मग या महिने दोन महिन्यात वनविभागात महत्त्वाचा दुवा असलेल्या येथील बीट गार्ड, क्षेत्र सहाय्यक हे काय करीत होते? हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.माहिती तर अशी आहे की हे अतिक्रमण एक-दोन नाही तर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. जवळपास ३१ हेक्टरवर हे अतिक्रमण करण्यात आले आहे. आणि ३१ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. हे अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपये खर्च केले आहेत. हे होत असताना बोंड बिटाचे वनरक्षक आणि क्षेत्र सहाय्यक वनविभागाची चाकरी करीत होते का? अन्य कोणाची, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत.तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये सोनटक्केंसारख्या जागरुक अधिकारी रुजू झाल्या आणि त्यांनी बारकाईने यात लक्ष घातले म्हणून हे प्रकरण उघड झाले नाही तर सारेच शेत कुंपणाने खाल्ले असते आणि म्हणूनच हे एवढ्यावरच न थांबविता या प्र्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ७० ते ८० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले ते कोणाच्या आशीर्वादाने हे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि यात जे खरोखरच दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.यातील दोषींवर ही कारवाई यासाठी की त्यांनी या अतिक्रमणास मज्जाव केला नाही. सोबतच ते लोकांच्या भावनेशीही खेळले. या जागेवर लोकांनी अतिक्रमण केल्यानंतर त्यांचे आणि या जागेचे एक नाते निर्माण झाले होते. या जागेच्या माध्यमातून त्यांनी उद्याची स्वप्ने रंगविली होती. पण आज त्यांच्या या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. वेळीच त्यांनी या अतिक्रमणास अटकाव केला असता तर अतिक्रमणधारकांवर ही अवस्था आली नसती आणि बोंड येथे जे वातावरण निर्माण झाले, ते वातावरण निर्माण झाले नसते, एवढे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.