शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांमधील गाळ उपसण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:18 IST

शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळावे, याकरिता शासनाने जिल्ह्यात शेकडो बंधारे बांधले. पण, यामध्ये गाळ साचल्याने खरीप पिके वाया जाण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : अन्यथा खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळावे, याकरिता शासनाने जिल्ह्यात शेकडो बंधारे बांधले. पण, यामध्ये गाळ साचल्याने खरीप पिके वाया जाण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.पिके वाचविण्यासाठी शेतकरी आपापल्या शक्तीप्रमाणे प्रयत्न करतात. पण, शेताजवळ असलेल्या बंधाºयाचाही मोठा उपयोग होतो. विविध योजनेअंतर्गत सर्वच तालुक्यात शेकडो बंधारे बांधण्यात आले. यातील अनेक बंधारे शेतकऱ्यांनी संजीवनी दिली. सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे खरीप हंगामात पावसाळ्यातील पाणी साचणार की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आता तर जलस्रोत आटल्याने शिवारातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी बहुतांश रब्बी पिके सुकत आहेत.या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सिंचन विभागाने विदर्भ सधन सिंचन अभियानांतर्गत सिंचन व साठवण बंधारे बांधण्यात आले. या बंधाºयांवर कोट्यधींचा खर्च झाला. पण, बºयाच बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्याने हा खर्च वाया गेल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. बंधाºयांमध्ये मूबलक जलसाठा असल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु, जिल्ह्यातील वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. सन २०१६-१७ मध्ये या कामांवर कोट्यवधी रूपये खर्च झाले. या बंधाऱ्यांमध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता संपली.मागील वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस मोठ्या प्रमाणात लावला. पाण्याअभावी कपासीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला पिकविता आला नाही. सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. आता दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. यंदा पाऊस कमी पडल्यास जिल्ह्यातील शेकडो बंधारे बिनकामी ठरण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.विहिरींनी गाठला तळविविध योजनांद्वारे जिल्ह्यात शेकडो विहिरी खोदण्यात आल्या. यातील अनेक विहिरी अर्धवट आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने विहिरींनी तळ गाठला. जलयुक्त शिवार अभियानदरम्यान केलेली सिंचनाची विविध कामे शेतातील विहिरींचा जलसाठा वाढविण्यास मदत करतील असे वाटत होते. पण, ही योजना केवळ पावसावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात शेतकºयांच्या मदतीला येऊ शकली नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शासनाने विशेष काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई