शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

संस्कृतीला टिकविण्यासाठी गीतमंचाची गरज

By admin | Updated: October 25, 2014 01:11 IST

प्रत्येक व्यक्ती गीतांच्या माध्यमातून रसमय जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. संगिताच्या माध्यमातून आचार..

दुर्गापूर : प्रत्येक व्यक्ती गीतांच्या माध्यमातून रसमय जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. संगिताच्या माध्यमातून आचार व विचार, सकारात्मक दृष्टीकोन घडविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करून या देशाचे भावी नागरिक असणारे आपल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देण्यासाठी, जीवनात योग्य ताल-लय जुळवून घेण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांनी जगण्याची योग्य दिशा ओळखून देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देण्यासाठी, सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, मानवमुक्ती यासाठी शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक व इतरही नागरिकांना गीतांच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकविण्यासाठी मोठा आधार म्हणजे गीतमंच होय, असे प्रतिपादन चंद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी केले.विद्या परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या पत्रानुसार आयोजित चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी देशभक्त शामलाल गुप्ता, गिरीजाकुमार माथूर, प्रदीप, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, सुरेश भट, साने गुरुजी, भा.रा. तांबे, बहिणाबाई चौधरी, जगदीश खेबुडकर, गोविंदाग्रज, कुसूमाग्रज यांच्या निवडक कविता व गीतांचा उल्लेख करून मानवी जीवनात संस्कारमय गीतांचे महत्व पटवून दिले.नुकतेच चंद्रपूर तालुक्यातील प्रत्येक जि.प. शाळेतून एका शिक्षकाचे गीतमंच प्रशिक्षण जि.प. उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर व खुटाळा येथे पार पडले. अतिथी व मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी लता कुळसंगे, केंद्र प्रमुख चिंदेश्वर गेडाम, रत्नमाला खोब्रागडे, मुख्याध्यापक वर्षा नळे, हिरकणी रायपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे प्रशिक्षण खुटाळा व उर्जानगर येथे दोन-दोन बिटांच्या गटात घेण्यात आले.चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून किटाळीचे पदवीधर शिक्षक डॅनिअल देवगडे, नकोडाच्या शिक्षिका प्रज्ञा माहुरकर, वढोलीचे शिक्षक शुद्धोधन मेश्राम, खुटाळाचे शिक्षक शंकर आसमपल्लीवार व जटपुरा शाळेच्या शिक्षिका शैला गाडेवार यांनी आपल्या प्रभावी व सुरेल वाणीने गीतमंचातील निवडक गीतांचा दोनही टप्प्यात उत्कृष्ट सराव शिक्षकांकडून करवून घेतला व प्रत्येक शाळेत ‘एक सुर-एक ताल’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे अशी प्रेरणा दिली.