शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीला टिकविण्यासाठी गीतमंचाची गरज

By admin | Updated: October 25, 2014 01:11 IST

प्रत्येक व्यक्ती गीतांच्या माध्यमातून रसमय जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. संगिताच्या माध्यमातून आचार..

दुर्गापूर : प्रत्येक व्यक्ती गीतांच्या माध्यमातून रसमय जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. संगिताच्या माध्यमातून आचार व विचार, सकारात्मक दृष्टीकोन घडविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करून या देशाचे भावी नागरिक असणारे आपल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देण्यासाठी, जीवनात योग्य ताल-लय जुळवून घेण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांनी जगण्याची योग्य दिशा ओळखून देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देण्यासाठी, सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, मानवमुक्ती यासाठी शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक व इतरही नागरिकांना गीतांच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकविण्यासाठी मोठा आधार म्हणजे गीतमंच होय, असे प्रतिपादन चंद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी केले.विद्या परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या पत्रानुसार आयोजित चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी देशभक्त शामलाल गुप्ता, गिरीजाकुमार माथूर, प्रदीप, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, सुरेश भट, साने गुरुजी, भा.रा. तांबे, बहिणाबाई चौधरी, जगदीश खेबुडकर, गोविंदाग्रज, कुसूमाग्रज यांच्या निवडक कविता व गीतांचा उल्लेख करून मानवी जीवनात संस्कारमय गीतांचे महत्व पटवून दिले.नुकतेच चंद्रपूर तालुक्यातील प्रत्येक जि.प. शाळेतून एका शिक्षकाचे गीतमंच प्रशिक्षण जि.प. उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर व खुटाळा येथे पार पडले. अतिथी व मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी लता कुळसंगे, केंद्र प्रमुख चिंदेश्वर गेडाम, रत्नमाला खोब्रागडे, मुख्याध्यापक वर्षा नळे, हिरकणी रायपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे प्रशिक्षण खुटाळा व उर्जानगर येथे दोन-दोन बिटांच्या गटात घेण्यात आले.चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून किटाळीचे पदवीधर शिक्षक डॅनिअल देवगडे, नकोडाच्या शिक्षिका प्रज्ञा माहुरकर, वढोलीचे शिक्षक शुद्धोधन मेश्राम, खुटाळाचे शिक्षक शंकर आसमपल्लीवार व जटपुरा शाळेच्या शिक्षिका शैला गाडेवार यांनी आपल्या प्रभावी व सुरेल वाणीने गीतमंचातील निवडक गीतांचा दोनही टप्प्यात उत्कृष्ट सराव शिक्षकांकडून करवून घेतला व प्रत्येक शाळेत ‘एक सुर-एक ताल’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे अशी प्रेरणा दिली.