शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

विदर्भाच्या प्रश्नावर लोकलढ्याची गरज

By admin | Updated: November 1, 2014 01:38 IST

विदर्भाच्या प्रश्नावर प्रामाणिक लोकलढ्याची गरज असल्याचे मत येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

  चंद्रपूर : विदर्भाच्या प्रश्नावर प्रामाणिक लोकलढ्याची गरज असल्याचे मत येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या साठीनंतरही विदर्भातील जनता उपेक्षित असल्याचे ते म्हणाले. ‘विकास विदर्भाचा’ या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांचे व्याख्यान शनिवारी चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाचे आयोजक असलेले डॉ. अशोक जीवतोडे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले, विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे ही विदर्भातील जनतेची मागणी आहे. विदर्भाची मागणी १२५ वर्षांपूर्वीची आहे. १८८८ मध्ये स्थानिक ब्रिटीश प्रशासनाने तत्कालिन व्हाईसरॉय यांच्याकडे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी केली होती. १९१८ मध्ये स्थानिक ब्रिटीश प्रशासनाने तत्कालिन व्हाईसरायकडे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची शिफारस केली होती. १९१८ मध्ये मॅटिग्यू चेम्सफार्ड आयोगाने या शिफारशीचे समर्थन केले होते. या समितीच्या शिफारशीवर विचार करण्यासाठी नेहरू समिती नेमण्यात आली होती. १९५३ मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भाची मागणी योग्य असल्याचे स्पष्ट केले असताना देखील विदर्भाची मागणी दिल्लीपर्यंत पोहोचली नाही. २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करण्यात आला व विदर्भातील आठही जिल्ह्यातील मराठी भाषिक नागरिक १९५६ साली द्विभाषिक मुंबई राज्यात सामील झाले. त्यावेळी विदर्भातील जनतेला काही अभिवचने देण्यात आली होती. मात्र ही शुद्ध फसवणूक होती, असे त्यांनी सांगितले. विदर्भ पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात सामील होऊनही विदर्भाच्या विकासाचा अनुशेष वाढतच गेला. पश्चिम महाराष्ट्र संपन्न होत असताना विदर्भ मात्र कंगाल होत राहिला. परिणामत: आज विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे. ११ वर्षांत बँकेचे कर्ज फेडता येत नाही म्हणून ३२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हिरवागार होत असताना विदर्भाचे सिंचन प्रकल्प कधी अपुरा निधी तर कधी झुडपी जंगलाचे अडथळे यात अर्धवट अवस्थेत अडकाून पडले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात ६० टक्के विजनिर्मिती केली जाते. परंतु विदर्भात विजेचा तुटवडा आहे. विदर्भातील ३२ लाख शेतकऱ्यांना फक्त ११ टक्के वीज मिळते, तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६५.५ टक्के वीजपुरवठा होतो. पुणे विभागाला मंजूर केलेला वीज पुरवठा ५१२ दशलक्ष युनिट आहे. परंतु प्रत्यक्षात एक हजार ९५७ दशलक्ष युनिट वीज वापरली जाते. विदर्भात आणखी ४५ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे कारखाने होऊ घातले आहेत. त्यासाठी सर्वाधिक पाण्याचा वापर होणार आहे. म्हणजे जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, वीज निर्मिती विदर्भाची यासाठी पर्यावरणाची हानी होणार विदर्भाची या भरवश्यावर लखलखाट पश्चिम महाराष्ट्रात होणार, अशी परिस्थिती आहे. विदर्भात १०० टक्के खनिज संपत्ती आहे. २३ प्रकारचे खनिज पदार्थ विदर्भात असुनही निधी वाटपात हातचलाखी केल्यामुळे व वनसंवर्धन कायद्याच्या अडसरीमुळे खनिजांवर आधारित उद्योग आले नाहीत. शेतमालावर आधारित, वनोउपजावर आधारित उद्योग आले नाहीत. त्यामुळे गडचिरोली, मेळघाटचे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे कुपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भात ७५ टक्के कापूस, ५८ टक्के वनक्षेत्र तर ८० टक्के लोहसाठा आहे; परंतु विदर्भात यावर आधारित उद्योग नाहीत. परिणामत: विदर्भात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार निर्माण झाले आहे. या भागातील सुशिक्षित युवकांना पुणे, मुंबईचा रस्ता धरावा लागतो हे वास्तव असल्याचे डॉ.जीवतोडे म्हणाले. विदर्भ प्रथम द्विभाषिक मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यात सामील झाले. परंतु नागपूर कराराची सातत्याने उपेक्षा करण्यात आली. त्यामुळेच लोकनेते बिजलाल बियानी, लोकनायक बापूजी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता आंदोलन केले. लोकनायक अणे हे काही लहान व्यक्तिमत्त्व नव्हते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. लोकनायक अणे यांनी उभी हयात विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठीच आपला देह झिजविला. पुढे विदर्भाच्या स्वातंत्र लढ्यात विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, भगवंतराव गायकवाड, नागविदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून अहेरीचे राजे माजी खासदार विश्वेश्वराव महाराज, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, माजी आमदार जीवतोडे गुरुजींनी विदर्भ लढ्यात सहभाग नोंदविला होता. परंतु ना विदर्भ राज्य ना विदर्भाचा विकास झाला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)