शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:43 IST

शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देहेमंत देशमुख : ऊर्जानगरात गोंडीयन समाजाचा प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. उर्जानगरातील स्नेहबंध सभागृहात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना महाराणी दुर्गावती शहिद दिनानिमित्त सत्कार व मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी, महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, प्रबोधकार दिलीप सोळंके, लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्र्रशाह आत्राम, सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे, प्राचार्य डॉ. विजय खंडाते व गोंडीयन आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या काळात पारंपरिक शिक्षण न घेता आधुनिक कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे. वैयक्तिक क्षमतांचा विकास करून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार व्हावे, असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले.अर्चना खंडाते यांना राणी हिराई सामाजिक पुरस्कार व महादेव देवाजी मडावी यांना गोंडवाना भूषण पुरस्काराने व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. सुधाकर मडावी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व माऊंट एव्हरेस्ट सर करणाºया शूर गिर्यारोहकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. खासदार बाळू धानोरकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मुख्य अभियंता राजु घुगे म्हणाले, आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. परंतु, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवावे. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. यश मिळविण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्रशाह आत्राम सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे प्राचार्य डॉ. खंडाते यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन रमेश कुंभरे, प्रास्ताविक, सुधाकर कन्नाके यांनी केले. सुनिल तलांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय तोडासे, ज्योती रावन गावडे राजेंद्र किन्नाके, प्रमोद इरपाते, प्रमोद कोवे, राजु कुंभरे, माणिक परचाके, रविंद्र पुसाम, बंडू कुळमेथे, सुभाष कोवे, प्रा धीरज शेडमाके, सुनील तलांडे, संजय तोडासे, निलेश कुमरे, अमृत आत्राम, दिनेश कुमरे, सारंग कुंभर, विद्यार्थी व गोंडीयन समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षण