शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कृतज्ञेतून वनसंवर्धनाची गरज

By admin | Updated: June 6, 2017 00:41 IST

निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. त्याविषयी कृतज्ञतेच्या जाणिवेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण व निसर्ग समृध्द ठेवणे,...

प्रभाकर मामूलकर : वृक्षदिंडी व सत्कार सोहळालोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. त्याविषयी कृतज्ञतेच्या जाणिवेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण व निसर्ग समृध्द ठेवणे, त्याचे संवर्धन करणे हे मानवी जीवनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. आपण विकासाच्या दिशेने प्रगतिपथावर वाटचाल करू लागलो, पण निसर्गाची आणि पर्यावरणाची मात्र हेडसांड झाली आहे. त्यामुळे सामाजिक कृतज्ञता बाळगून वनसंवर्धनाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रभाकर मामूलकर यांनी केले.श्री शिवाजी महाविद्यालय राजूरा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘वनसंवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, रेखा पहानपटे, बबन जानवे, कवडू चहारे, वडस्कर, मुख्याध्यापक एस. आर. निब्रड, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य सुधाकर धांडे, संचालक साजिद बियाबानी, वनअधिकारी आर.एस.घुग्लोत, एस. के. धांडे, एम.आर. गोविंदवार आदी उपस्थित होते. यावेळी शिवाणी किल्लारे, स्नेहल टेभुर्णे, मयुर चव्हाण, सुरज दहागावकर, कविता अडवे, जयश्री अनमुलवार, साक्षी राजुलवार, अश्विनी चेनुरवार, शबाना शेख, कविता दुर्गे, सपना आत्राम, राकेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.