शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

रॉकेल कोट्यातील कपातीने गरज भागेना

By admin | Updated: October 21, 2014 22:49 IST

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढला आहे.

चंद्रपूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढला आहे. मात्र, जिल्ह्याच्या रॉकेल कोट्यात कपात झाल्याने लाभार्थ्याला कमी रॉकेल दिला जात आहे. त्यामुळे अनेकांना इंधनाचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. केरोसीन कोट्यात कपात झाल्याने एका शिधापत्रिकेवर पाच लिटर रॉकेल ऐवजी केवळ दोन ते तीन लिटर रॉकेल मिळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण परिसरामध्ये घरगुती वापरासाठी इंधन म्हणून रॉकेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. घरगुती गॅसच्या किंमती गगणाला भिडले आहेत. तर आॅनलाईन प्रणालीमुळे अनेकांना वेळेवर गॅस सिलींडर मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रॉकेलवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशीच स्थिती इतर तालुक्यातही असून अनेक गावांमध्ये वीज असूनसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बऱ्याच गावातील वीज रात्रीच्या वेळी खंडित होत आहे. त्यामुळे अनेक गावामध्ये स्वयंपाक तसेच रात्रीच्या उजेडासाठी रॉकेलचा उपयोग करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील रॉकेलचा पुरवठाच नगण्य झाल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात रॉकेलची साठेबाजी व काळ्या बाजाराला उत आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तालुक्यात रॉकेलसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे.रॉकेल आले तरी ते अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने त्याचा फारसा उपयोग नागरिकांना होत नाही. त्यामुळे रॉकेलअभावी रोजच्या स्वयंपाकाचीही अडचण निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांना वनविभागातर्फे निस्ताराचे जळावू बिटसुद्धा वेळेवर देण्यात येत नसल्याने सरपनाचा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचा विपरीत परिणाम अवैध वृक्षतोडीवर होत आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी नागरिकांना मज्जाव करीत आहेत. यापूर्वी पोंभूर्णा येथे २ हजार ६४० कार्डधारकांसाठी पाच दुकानदारांकडून १८ हजार लिटर रॉकेल वितरीत केले जायचे. मात्र आता केवळ साडे चार ते पाच हजार लिटर रॉकेलचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांना एका कार्डवर दोन ते तीन लिटर पेक्षा जास्त रॉकेल लाभार्थ्याला मिळत नाही. ग्राहकांचे कमी रॉकेलमध्ये भागत नसल्याने विक्रेत्याकडून जास्त रॉकेलची मागणी करतात. त्यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ वाद निर्माण होत आहे. या प्रकारामुळे ग्राहक आणि दुकानदारही त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)