शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तंटामुक्त समिती निवडीचा नवरगाव ग्रामपंचायतीला विसर

By admin | Updated: April 23, 2015 01:02 IST

येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही.

नवरगाव : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही. जुन्या समितीचीही फेरनिवड मागील दोन वर्षांपासून झालेली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला समिती निवडीचा विसर तर पडला नाही ना? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.गावातील तंटे गावातच मिटावे न्यायालयापर्यंत जाण्याची पाळी नागरिकांवर येऊ नये, यासाठी तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आली. गावागावात तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली. तंटामुक्त समित्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी बक्षिसरुपी देणगीही देण्याचे ठरविण्यात आले. कित्येक गावांनी उल्लेखनीय कार्य करून बक्षीस पटकाविले. तंटामुक्त समित्यांना राजकीय गंध लागू नये, यासाठी विविध क्षेत्रातील आणि त्या-त्या क्षेत्रात पारंगत असलेल्या लोकांचा समावेश व्हावा, जेणेकरुन न्याय निवाडा निष्पक्षपाती होईल हा त्या मागचा उद्देश होता. सुरुवातीला या निकषाचे पालनही झाले अन् आता या तंटामुक्त समितीत राजकारण शिरले आहे. दरवर्षी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी तंटामुक्त समिती सदस्यांची निवड केली जाते. प्रत्येक गावात दरवर्षी तंटामुक्त समिती अथवा अध्यक्षाची निवड करण्याची अथवा फेरनिवड करण्याची प्रथा आहे. परंतु नवरगाव हे अपवाद ठरले आहे. मागील दोन वर्षांपासून येथे तमुंस अध्यक्षाची निवड झालेली नाही.तंटामुक्त समित्यांची स्थापना झाली तेव्हापासून प्रत्येक तालुक्यातील ७० ते ८० गावांना तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार रकमेचा वापर गाव विकासासाठी झाला. परंतु नवरगाव अजूनही पुरस्कारापासून वंचित आहे. याला येथील तंटामुक्त समितीची निष्क्रियता म्हणायची की, नियोजन शुन्यता हे न समजन्याच्या पलिकडेच आहे.तंटामुक्त समितीची निवड अजूनही झाली नसताना पोलीस पाटलाची निवड का करण्यात आली नाही, असा हेही एक कोडेच आहे. समिती निवडीचा विसर पडलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करावी अशी मागणी गावतील नागरिक करीत आहे. समिती अभावी गावात अनेकदा तंटे निर्माण होत असतात. (वार्ताहर)