शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

By admin | Updated: December 25, 2014 23:29 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने

पुलांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष : प्रशासन व लोकप्रतिनिधीची उदासीनताचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने किंवा पायदळच नदीपात्रातूनच प्रवास करावा लागत आहे. नदीपात्र खोलगट असल्याने हा प्रवास धोक्याचा आहे. मात्र कमी अंतराच्या फेऱ्यामुळे सारे धोके प्रवाशी पत्कारताना दिसून येत आहे. कोरपना तालुक्यातील परसोडा, पारडी, गांधीनगर हे अनुक्रमे तीन नदीघाट आहे. येथून प्रवाशांची नियमित ये- जा सुरू असते. या तिन्ही घाटांवर पूल निर्मिती होण्याची नितांत गरज आहे. हे मार्ग कोरपना व मुकूटबन शहराला जोडणारे कमी अंतराचे असल्याने नियमित रेलचेल असते. शिवाय कोरपना, वणी, झरी (जामणी) व तेलंगणातील बेला मंडल परिसरातील नागरिकांना रहदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे आहे. परंतु या नदीघाटावर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटूनही व वारंवार मागणीे होऊनही पुल निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या घाटावरुन जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. यातील पारडी (खातेरा) नदीघाटावर पुल निर्मितीसाठी शासनातर्फे सत्कारत्मक पावले उचलली गेली. पुलांच्या निर्मिती कार्यालाही मंजुरी देण्यात आली. परंतु राजकीय वरदहस्तापुढे चक्क पुलच पळवून नेण्याचा प्रकार घडला. येथील निर्माणधीन पूल झरी (जामणी) तालुक्यातील दिग्रस येथून तेलंगणामधील जैतन मंडलच्या अनंतपूर नदीघाटाला जोडला गेला. या पुलांची निर्मिती होऊन नियमित रहदारीही सुरू झाली. शासन दरबारी आजपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या पुलांच्या निर्मितीचा आराखडा अद्यापही तयार केला नसल्याने पुलांच्या निर्मितीचे भवितव्य अंधारीतच आहे. यापूर्वी याच पैनगंगा नदीवर कोडशी (खुर्द), वनोजा येथे पुलांची निर्मिती करण्यात आली. यातील वनोजा पूल पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा निर्मिती करण्यात आली. परंतु यातील एकाही पुलांचा अनुशेष अद्यापही दूर होऊ शकला नाही. वाहतुकीच्या दृष्टीने कोरपना- वणी, गडचांदूर- वणी मार्ग सुलभ झाले असले तरी, तीन पुलांचा अनुशेष बाकीच आहे. याबरोबरच तेलगंणा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुर्भा- सांगडी, भेदोडा- धानोरा, खोगदूर- हिरापूर या पुलांचाही अनुशेष पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तेलंगणातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना याच नवनिर्मित दिग्रस पुलाचा एकमेव मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा आहे. परंतु अंतराच्या दृष्टीने हा मार्ग जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारा नाही.पारडी येथे पुलाची निर्मिती झाल्यास पारडी, रुपापेठ, मेहंदी, अकोला व नदीपलीकडील खातेरा, खडकी, आयलोन, अडेगाव आदी गावासाठी सोयीचे होईल. परसोडा घाटावर केल्यास परसोडा, परसोडा गुडा, कोठोडा, दुर्गाडी, पांडूगुडा, नदीपलीकडील पिंपरड, राजूर, बैलनपूर, हिरापूर, मांगली व तेलगंणातील कोब्बई भागातील गावातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. गांधीनगर येथे पूल झाल्यास कोडशी (बु.), कोडशी (खु.), हेटी, तुळशी, शिवाजीनगर, गांंधीनगर, जेवरा, नदीपलीकडील तेजापूर, चिखली, देऊरवाडा, आमलोन आदी गावासाठी रहदारी व व्यापारपेठांच्या दृष्टीने सोयीचे होईल. कोरपना व मुकूटबन या शहरातील बाजारपेठेला यामुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. दोन्ही भागात भाजपाचेच लोकप्रतिनिधी असल्याने नव्या सरकारकडून आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)