शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

By admin | Updated: December 25, 2014 23:29 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने

पुलांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष : प्रशासन व लोकप्रतिनिधीची उदासीनताचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने किंवा पायदळच नदीपात्रातूनच प्रवास करावा लागत आहे. नदीपात्र खोलगट असल्याने हा प्रवास धोक्याचा आहे. मात्र कमी अंतराच्या फेऱ्यामुळे सारे धोके प्रवाशी पत्कारताना दिसून येत आहे. कोरपना तालुक्यातील परसोडा, पारडी, गांधीनगर हे अनुक्रमे तीन नदीघाट आहे. येथून प्रवाशांची नियमित ये- जा सुरू असते. या तिन्ही घाटांवर पूल निर्मिती होण्याची नितांत गरज आहे. हे मार्ग कोरपना व मुकूटबन शहराला जोडणारे कमी अंतराचे असल्याने नियमित रेलचेल असते. शिवाय कोरपना, वणी, झरी (जामणी) व तेलंगणातील बेला मंडल परिसरातील नागरिकांना रहदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे आहे. परंतु या नदीघाटावर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटूनही व वारंवार मागणीे होऊनही पुल निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या घाटावरुन जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. यातील पारडी (खातेरा) नदीघाटावर पुल निर्मितीसाठी शासनातर्फे सत्कारत्मक पावले उचलली गेली. पुलांच्या निर्मिती कार्यालाही मंजुरी देण्यात आली. परंतु राजकीय वरदहस्तापुढे चक्क पुलच पळवून नेण्याचा प्रकार घडला. येथील निर्माणधीन पूल झरी (जामणी) तालुक्यातील दिग्रस येथून तेलंगणामधील जैतन मंडलच्या अनंतपूर नदीघाटाला जोडला गेला. या पुलांची निर्मिती होऊन नियमित रहदारीही सुरू झाली. शासन दरबारी आजपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या पुलांच्या निर्मितीचा आराखडा अद्यापही तयार केला नसल्याने पुलांच्या निर्मितीचे भवितव्य अंधारीतच आहे. यापूर्वी याच पैनगंगा नदीवर कोडशी (खुर्द), वनोजा येथे पुलांची निर्मिती करण्यात आली. यातील वनोजा पूल पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा निर्मिती करण्यात आली. परंतु यातील एकाही पुलांचा अनुशेष अद्यापही दूर होऊ शकला नाही. वाहतुकीच्या दृष्टीने कोरपना- वणी, गडचांदूर- वणी मार्ग सुलभ झाले असले तरी, तीन पुलांचा अनुशेष बाकीच आहे. याबरोबरच तेलगंणा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुर्भा- सांगडी, भेदोडा- धानोरा, खोगदूर- हिरापूर या पुलांचाही अनुशेष पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तेलंगणातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना याच नवनिर्मित दिग्रस पुलाचा एकमेव मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा आहे. परंतु अंतराच्या दृष्टीने हा मार्ग जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारा नाही.पारडी येथे पुलाची निर्मिती झाल्यास पारडी, रुपापेठ, मेहंदी, अकोला व नदीपलीकडील खातेरा, खडकी, आयलोन, अडेगाव आदी गावासाठी सोयीचे होईल. परसोडा घाटावर केल्यास परसोडा, परसोडा गुडा, कोठोडा, दुर्गाडी, पांडूगुडा, नदीपलीकडील पिंपरड, राजूर, बैलनपूर, हिरापूर, मांगली व तेलगंणातील कोब्बई भागातील गावातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. गांधीनगर येथे पूल झाल्यास कोडशी (बु.), कोडशी (खु.), हेटी, तुळशी, शिवाजीनगर, गांंधीनगर, जेवरा, नदीपलीकडील तेजापूर, चिखली, देऊरवाडा, आमलोन आदी गावासाठी रहदारी व व्यापारपेठांच्या दृष्टीने सोयीचे होईल. कोरपना व मुकूटबन या शहरातील बाजारपेठेला यामुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. दोन्ही भागात भाजपाचेच लोकप्रतिनिधी असल्याने नव्या सरकारकडून आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)