शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली : पावसाने कापूस, सोयाबीन, धान शेती भुईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या व अवेळी आलेल्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, धान पिकाला मोठा फटका बसला आहे. नोव्हेंबर महिना म्हणजे पीक हाती येण्याची वेळ. मात्र हाती येणारे पीक पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हिरावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाच्या वतीने सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव बघता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली. पुन्हा नवे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबू लागले. यावर्षी तरी चांगले उत्पादन होऊन घरी सुबत्ता येईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच परतीच्या पावसाने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कापूस पिकाला चांगली बोंडे आली होती. तर सोयाबीन पीक काही शेतकऱ्यांनी कापून शेतात कडपा करून ठेवला होता. सारे काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पावसाच्या तडाख्यात सापडले. इकडे दिवाळी साजरी करण्याची लगबग असतानाच पावसाने डाव साधला. आणि कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पीक पावसाच्या कचाट्यात सापडले. सोयाबीन पीक तर शेतकऱ्यांनी कापून ठेवले होते. परंतु आलेल्या पावसाने सोयाबीन पिकाची पार वाट लावून टाकली.कापूस व धान पीक पावसाने पूर्णत: आडवे पाडले. परतीच्या पावसाने डोळ्यादेखत पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. सोयाबीन पिकाला मोठया प्रमाणात फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. कापूस व धान पीक पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.वर्षभराचे बजेट कोलमडलेखरिपातील पिकांवर शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाने शेतकºयांची इतकी बिकट अवस्था करून टाकली आहे की पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. खरिपातील पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेटच कोलमडला आहे.रबी हंगाम कसा करावा?ऐनवेळी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने हाती येणाऱ्या पिकांची पुरती वाट लागली आहे. दिवसरात्र शेतात राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरले नाही. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने आता रब्बी हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीनचे ढिगारेच पाण्याखाली आले. कपाशी, धान, ज्वारी पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी