शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामाने अडेगावातील नाल्याला आले नदीचे स्वरुप

By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले.

सलग तीन बंधारे : शेतकऱ्यांना फायदा, ९० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली चंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले. नवीन बंधाऱ्यासह नाल्यावरील जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने या नाल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अडेगाव शिवारात एका नाल्यावर सलग ३ बंधारे घेऊन खोलीकरण करण्यात आल्याने हा नाला नदीत रुपांतरीत झाला आहे. परिसरातील शंभर शेतकऱ्यांना ९० हेक्टरला या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.जिल्ह्यात नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यासह जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे, बोडी नुतनीकरण यासारखी अनेक कामे जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आली आहे. यावर्षी अभियानाच्या दुसऱ्या वर्षातही विविध कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावच्या शिवारात असलेल्या नाल्यावर काही वषार्पूर्वी तीन सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले होते. दरम्यानच्या काळात गाळ मोठ्या प्रमाणावर साचल्याने या बंधाऱ्यात थोडे पाणी साचून उर्वरीत पाणी निघून जात होते. तसेच गाळाने भरलेल्या या बंधाऱ्याचा लगतच्या शेतकऱ्यांनाही फायदा होत नव्हता.गेल्या वर्षी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी या नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सलग तीन बंधाऱ्याची एकूण लांबी १५०० मिटर इतकी आहे. या सर्व भागाचे खोलीकरण करण्यात आले. पूर्ण लांबीची खोली आता सरासरी तीन मिटर इतकी आहे. जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात तीनही बंधारे तुंडूंब भरुन वाहू लागले आहे. रुंदीकरणामुळे तसेच पाणी भरल्याने हा नाला आता नदीत रुपांतरीत झाला आहे.पूर्वी सिंचनाची सोय नसल्याने किंवा उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागत होते. खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्यास हे पीकही हातचे जायचे. बंधाऱ्यामुळे खरीपाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या बंधाऱ्यामुळे आमच्या उत्पनात वाढ होण्यासोबतच एकापेक्षा जास्त पिके आम्हाला घेता येईल, अशी प्रतिक्रिया बंधारा शिवारातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) प्रत्येक बंधाऱ्यात ४५ टीसीएम पाणी साठा कृषी विभागाच्या सलग खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून या कामावर २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले. नाल्याच्या लगत व परिसरातील १०० शेतकऱ्यांना बंधाऱ्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. तर जवळपास ९० हेक्टर जमिनी सिंचनाखाली येतील. एका बंधाऱ्यात १५ या प्रमाणे तीन बंधाऱ्यात ४५ टीसीएम इतका पाणी साठा झाला आहे.