शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जलयुक्तच्या कामाने अडेगावातील नाल्याला आले नदीचे स्वरुप

By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले.

सलग तीन बंधारे : शेतकऱ्यांना फायदा, ९० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली चंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले. नवीन बंधाऱ्यासह नाल्यावरील जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने या नाल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अडेगाव शिवारात एका नाल्यावर सलग ३ बंधारे घेऊन खोलीकरण करण्यात आल्याने हा नाला नदीत रुपांतरीत झाला आहे. परिसरातील शंभर शेतकऱ्यांना ९० हेक्टरला या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.जिल्ह्यात नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यासह जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे, बोडी नुतनीकरण यासारखी अनेक कामे जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आली आहे. यावर्षी अभियानाच्या दुसऱ्या वर्षातही विविध कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावच्या शिवारात असलेल्या नाल्यावर काही वषार्पूर्वी तीन सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले होते. दरम्यानच्या काळात गाळ मोठ्या प्रमाणावर साचल्याने या बंधाऱ्यात थोडे पाणी साचून उर्वरीत पाणी निघून जात होते. तसेच गाळाने भरलेल्या या बंधाऱ्याचा लगतच्या शेतकऱ्यांनाही फायदा होत नव्हता.गेल्या वर्षी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी या नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सलग तीन बंधाऱ्याची एकूण लांबी १५०० मिटर इतकी आहे. या सर्व भागाचे खोलीकरण करण्यात आले. पूर्ण लांबीची खोली आता सरासरी तीन मिटर इतकी आहे. जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात तीनही बंधारे तुंडूंब भरुन वाहू लागले आहे. रुंदीकरणामुळे तसेच पाणी भरल्याने हा नाला आता नदीत रुपांतरीत झाला आहे.पूर्वी सिंचनाची सोय नसल्याने किंवा उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागत होते. खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्यास हे पीकही हातचे जायचे. बंधाऱ्यामुळे खरीपाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या बंधाऱ्यामुळे आमच्या उत्पनात वाढ होण्यासोबतच एकापेक्षा जास्त पिके आम्हाला घेता येईल, अशी प्रतिक्रिया बंधारा शिवारातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) प्रत्येक बंधाऱ्यात ४५ टीसीएम पाणी साठा कृषी विभागाच्या सलग खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून या कामावर २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले. नाल्याच्या लगत व परिसरातील १०० शेतकऱ्यांना बंधाऱ्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. तर जवळपास ९० हेक्टर जमिनी सिंचनाखाली येतील. एका बंधाऱ्यात १५ या प्रमाणे तीन बंधाऱ्यात ४५ टीसीएम इतका पाणी साठा झाला आहे.