शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:38 IST

मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : परिसरातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी (ता.राजुरा) : मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.गोवरी परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू व निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा एकमेव शेतकऱ्यांचा एकमेव आधार आहे. परंतु दिवसेंदिवस निसर्गाचे रुप पूर्णत: पालटल्याने सर्व उलटे चक्र फिरायला लागले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी वर्षानुवर्षापासून भरडला गेला आहे. आणि ती परिस्थिती आजही शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्पादनात भरभराट होईल असे शेतकºयांना वाटत होते.मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल असे वाटत असतानाच दिवस काही भागात समाधानकारक पाऊस पडला. शेतकºयांनी लगबगीने कपाशी लागवड व सोयाबिनची पेरणी केली. यावर्षी दुबार पेरणीचा फटका शेतकºयांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन खरीप हंगामाचा तोंडावर पावसाने शेतकºयांना दगा दिला. उसणवारी व कर्ज काढून महागड्या बियाण्यांची शेतकºयांनी पेरणी केली.जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे पाण्याअभावी जमिनीतच करपायला लागले आहे. शेतकºयांनी पैशाची जुळवाजुळव करुन बियाणे खरेदी केली. त्यांच्या खिशात आता दमडीही पैसा शिल्लक उरली नाही. शेतकºयांवर असे दु:खाचे आभाळ कोसळले असतानाच पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली. येथेच शेतकºयांचा घात झाला.शासन शेतकºयांच्या वेदना समजून घेत नाही. निसर्ग शेतकºयाना साथ देत नाही. शेतकºयांना पाठीवर मायेने हात फिरवून त्यांचे आभाळभर दु:ख समजून घेणारा दाता कुणीच उरला नाही. शेतकºयांचा हा एकाकी लढा आयुष्यभर असाच अविरत सुरु आहे. निसर्गाला लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती बेभरवशाची झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा आली आहे.शेतकरी असा आयुष्यभर वेदनांनी भरडला जात असताना या जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये ही कृषीप्रदान देशाची मोठी शोकांतिका आहे.ऊन, वारा, पावसाची जराही तमा न बाळगता शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायमची निराशाच आली आहे. याच काळ्या मातीत जन्म घ्यायचा आणि आयुष्याला सायंकाळी अखेरचा श्वासही हतबल होऊन इथेच सोडायचा, अशी विपरीत परिस्थिती शेतकºयांवर आली आहे. पाऊस पडला नाही तर शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.