शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
7
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
8
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
9
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
10
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
12
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
13
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
14
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
15
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
16
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
17
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
18
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
19
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
20
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:38 IST

मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : परिसरातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी (ता.राजुरा) : मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.गोवरी परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू व निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा एकमेव शेतकऱ्यांचा एकमेव आधार आहे. परंतु दिवसेंदिवस निसर्गाचे रुप पूर्णत: पालटल्याने सर्व उलटे चक्र फिरायला लागले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी वर्षानुवर्षापासून भरडला गेला आहे. आणि ती परिस्थिती आजही शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्पादनात भरभराट होईल असे शेतकºयांना वाटत होते.मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल असे वाटत असतानाच दिवस काही भागात समाधानकारक पाऊस पडला. शेतकºयांनी लगबगीने कपाशी लागवड व सोयाबिनची पेरणी केली. यावर्षी दुबार पेरणीचा फटका शेतकºयांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन खरीप हंगामाचा तोंडावर पावसाने शेतकºयांना दगा दिला. उसणवारी व कर्ज काढून महागड्या बियाण्यांची शेतकºयांनी पेरणी केली.जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे पाण्याअभावी जमिनीतच करपायला लागले आहे. शेतकºयांनी पैशाची जुळवाजुळव करुन बियाणे खरेदी केली. त्यांच्या खिशात आता दमडीही पैसा शिल्लक उरली नाही. शेतकºयांवर असे दु:खाचे आभाळ कोसळले असतानाच पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली. येथेच शेतकºयांचा घात झाला.शासन शेतकºयांच्या वेदना समजून घेत नाही. निसर्ग शेतकºयाना साथ देत नाही. शेतकºयांना पाठीवर मायेने हात फिरवून त्यांचे आभाळभर दु:ख समजून घेणारा दाता कुणीच उरला नाही. शेतकºयांचा हा एकाकी लढा आयुष्यभर असाच अविरत सुरु आहे. निसर्गाला लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती बेभरवशाची झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा आली आहे.शेतकरी असा आयुष्यभर वेदनांनी भरडला जात असताना या जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये ही कृषीप्रदान देशाची मोठी शोकांतिका आहे.ऊन, वारा, पावसाची जराही तमा न बाळगता शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायमची निराशाच आली आहे. याच काळ्या मातीत जन्म घ्यायचा आणि आयुष्याला सायंकाळी अखेरचा श्वासही हतबल होऊन इथेच सोडायचा, अशी विपरीत परिस्थिती शेतकºयांवर आली आहे. पाऊस पडला नाही तर शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.