शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:38 IST

मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : परिसरातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी (ता.राजुरा) : मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.गोवरी परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू व निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा एकमेव शेतकऱ्यांचा एकमेव आधार आहे. परंतु दिवसेंदिवस निसर्गाचे रुप पूर्णत: पालटल्याने सर्व उलटे चक्र फिरायला लागले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी वर्षानुवर्षापासून भरडला गेला आहे. आणि ती परिस्थिती आजही शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्पादनात भरभराट होईल असे शेतकºयांना वाटत होते.मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल असे वाटत असतानाच दिवस काही भागात समाधानकारक पाऊस पडला. शेतकºयांनी लगबगीने कपाशी लागवड व सोयाबिनची पेरणी केली. यावर्षी दुबार पेरणीचा फटका शेतकºयांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन खरीप हंगामाचा तोंडावर पावसाने शेतकºयांना दगा दिला. उसणवारी व कर्ज काढून महागड्या बियाण्यांची शेतकºयांनी पेरणी केली.जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे पाण्याअभावी जमिनीतच करपायला लागले आहे. शेतकºयांनी पैशाची जुळवाजुळव करुन बियाणे खरेदी केली. त्यांच्या खिशात आता दमडीही पैसा शिल्लक उरली नाही. शेतकºयांवर असे दु:खाचे आभाळ कोसळले असतानाच पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली. येथेच शेतकºयांचा घात झाला.शासन शेतकºयांच्या वेदना समजून घेत नाही. निसर्ग शेतकºयाना साथ देत नाही. शेतकºयांना पाठीवर मायेने हात फिरवून त्यांचे आभाळभर दु:ख समजून घेणारा दाता कुणीच उरला नाही. शेतकºयांचा हा एकाकी लढा आयुष्यभर असाच अविरत सुरु आहे. निसर्गाला लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती बेभरवशाची झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा आली आहे.शेतकरी असा आयुष्यभर वेदनांनी भरडला जात असताना या जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये ही कृषीप्रदान देशाची मोठी शोकांतिका आहे.ऊन, वारा, पावसाची जराही तमा न बाळगता शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायमची निराशाच आली आहे. याच काळ्या मातीत जन्म घ्यायचा आणि आयुष्याला सायंकाळी अखेरचा श्वासही हतबल होऊन इथेच सोडायचा, अशी विपरीत परिस्थिती शेतकºयांवर आली आहे. पाऊस पडला नाही तर शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.