शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चंद्रपुरात राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:09 IST

येथील वन अकादमीमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येत असून त्याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने सादर करावा, ...

ठळक मुद्देप्रस्ताव सादर करा : सुधीर मुनगंटीवार यांचे वनविभागाला निर्देश

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील वन अकादमीमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येत असून त्याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने सादर करावा, तसेच त्यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.शनिवारी यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर पाटील, मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक जीत सिंग, चंद्रपूर प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे आदी उपस्थित होते.उद्योगांची गरज ओळखून कुशल मनुष्यबळ निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगून ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर वन अकादमीमध्ये निर्माण होणारे हे राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र केवळ चंद्रपूर किंवा महाराष्ट्रासाठी नाही तर आसपासच्या राज्यांसाठीही उपयुक्त ठरावे इतके याचे काम उत्तम झाले पाहिजे. यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या समन्वयातून केंद्राचे काम वेगाने पुढे कसे जाईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कौशल्य प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम निश्चित करताना त्याचा सखोल विचार केला जावा. त्याला शास्त्रीय आणि व्यावसायिक आधार असावा, शिक्षकांची नियुक्तीही त्याचप्रकारे केली जावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.कौशल्य विकासातून देशाला कुशल मनुष्यबळ मिळणार असल्याने त्यासाठी लागणारा निधी हा खर्च नाही तर गुंतवणूक म्हणून पाहिला जावा. कौशल्य विकास केंद्रासाठी सामाजिक दायित्वातून निधी मिळवताना शासनाच्या पेट्रोलियम कंपन्यांशी चर्चा करावी, त्या अनुषंगाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासमवेत बैठक आयोजित करावी, त्यांच्यासमोर यासंबंधीचे सादरीकरण करावे, असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.कौशल्य विकास केंद्राची रचना करताना अन्न व कृषी प्रक्रिया उद्योग, वनाधारित उद्योग, वन पर्यटनाला प्रोत्साहन देणारे उद्योग, हस्तकला, आॅटोमोटीव्ह, दागिणे बनवणे, खाण उद्योगाची गरज ओळखून आवश्यक असणारे मनुष्यबळ, पॉवर टुरीझमशी संबंधित उद्योग, यासगळ्या बाबींचा विचार केला जावा. ज्या उद्योगांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ हवे आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार करता येतो का, याची शक्यता तपासून पाहावी, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.ही असेल केंद्राची शक्तीस्थानेचंद्रपूर वन अकादमी, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, कौशल्य विकास केंद्र आणि जलसाक्षरता केंद्र ही या वन अकादमीची शक्तीस्थाने आहेत. २०१९ पर्यत यातील बरीच कामे पूर्णत्वाला जातील. यादृष्टीने कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जावी. वन अकादमीत राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र निर्माण करताना इंडस्ट्री रेडी वर्क फोर्स तयार होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत. केंद्रात ३० ते ४० टक्के प्रशिक्षण हे वनाधारित रोजगार संधींवर दिले जावे, असेही निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.