शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपूर बोर्डात २४ लाखांवर दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:50 IST

सध्या नागपूर बोर्डाकडे संपूर्ण उत्तरपत्रिका संकलित झाल्या असून तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देइतर विभागांचे काम पूर्ण झाल्यानंतर लागणार निकाल

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार यासंदर्भात अद्यापतरी तारीख निश्चित झाली नाही. असे असले तरी नागपूर बोर्डाना उत्तरपत्रिका संकलित करण्यापासून तर तपासणीपर्यंतचे काम पूर्ण केले आहे. विभागाने यावर्षी २४ लाख ५४ हजार ५०४ उत्तरपत्रिका तपासल्या असून इतर विभागाच्या कामानुसार राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे.यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बारावीची तर मार्चमध्ये दहावीची परीक्षा झाली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडेच अडकून पडल्या होत्या. बोर्डाने शासनानेकडे विशेष परवानगी मागून त्या संकलित केल्या. दरम्यान, सध्या नागपूर बोर्डाकडे संपूर्ण उत्तरपत्रिका संकलित झाल्या असून तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. नागपूर विभागात दहावीसाठी १ लाख ८७ हजार ७९७ तर बारावीसाठी १ लाख ६८ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांच्या एकूण २४ लाख ५४ हजार उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बोर्डाकडे आल्या. या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, राज्यातील इतर विभागातील उत्तरपत्रिका तपासणी तसेच याद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच दहावी तसेच बारावीचा निकाल लागणार आहे.गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा संधीदहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी बोर्डाने यावर्षी प्रथमच नागपूर येथे न बोलाविता जिल्हास्तरावर समिती गठित करून या माध्यमातून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. दरम्यान, काही विद्यार्थी यावेळी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी बोर्डाने नियोजन केले आहे. यामध्ये २३ जूनला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, २५ ला वर्धा आणि २६ ला नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे समिती म्हणणे ऐकूण घेणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्तरपत्रिका संकलित करण्यासाठी थोडाफार वेळ गेला. मात्र सध्यास्थितीत उत्तरपत्रिका तपासणीसह अन्य कामे अंतीम टप्प्यात आहे.-रविकांत देशपांडेविभागीय सचिव,विभागीय मंडळ नागपूर

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल