शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नागभीड पं.स. चे नगरपंचायतीला समर्थन

By admin | Updated: March 11, 2016 01:41 IST

नागभीड नगरपरिषद होत नसेल तर किमान नगरपंचायत तरी स्थापन करावी आणि नागभीडचा विकास साधावा,

मासिक सभेत ठराव : शासनाने दखल घेण्याची मागणीनागभीड : नागभीड नगरपरिषद होत नसेल तर किमान नगरपंचायत तरी स्थापन करावी आणि नागभीडचा विकास साधावा, या मताशी नागभीड पंचायत समिती अनुकूल असून तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे.शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळे नगरपंचायती बनल्या असून अपवाद फक्त नागभीड ग्रामपंचायत ठरली आहे. याला कारण येथील आ. बंटी भांगडिया यांचा पूर्ण कल नगरपरिषदेकडे असला तरी, नगरपरिषदेसाठी पुरेशी लोकसंख्या जुळत नसल्याने नगरपरिषदेचे घोडे अडून आहेत.नगरपरिषदेसाठी किमान २५ हजार लोकसंख्येची अट आहे. ही लोकसंख्या नागभीड पूर्ण करु शकत नाही आणि म्हणूनच नवखळा, बामणी, डोंगरगाव, चिखलपरसोडी, त्रिकेश्वर, तुकूम, तिव्हर्ला ही गावे समाविष्ट करुन घेण्याचा पर्याय समोर आला. तशी तयारीही करण्यात आली. पण नंतर आमची गावे नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट झाली तर भविष्यात अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल, या निमित्त्याने यातील काही गावांनी नगरपरिषदेत समाविष्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे नागभीड नगरपरिषदेचे भविष्य आज तरी अंधातरीच दिसत आहे. म्हणूनच नगरपरिषदेला पर्याय म्हणून नगरपंचायतीची मागणी करुन तिची स्थापना करण्यास काय हरकत आहे, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत. नागभीड येथे नगरपंचायतीची स्थापनेचा पर्याय निघाल्यास या नगर पंचायतीमध्ये नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांना समाविष्ठ करुन घेण्यास काहीच हरकत नाही. कारण ही गावे आता अलग अलग राहीलेच नाही तर एकमेकांना जुळून गेली आहेत. या गावांची मिळून एक सर्वांग सुंदर नगर पंचायत होऊ शकते. नागभीड पंचायत समितीने घेतलेल्या ठरावात केवळ नागभीडचाच उल्लेख केला असला ती नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांनाही समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय झाला तर नागभीड पंचायत समितीने ने आडकाठी आणून नये. सद्यस्थितीत नगर विकास मंत्रालयाकडून नगरपचायतींना निधी जे वितरण केले आहे ते लक्षणीय आहे. नागभीडलाही विकासासाठी असे अनुदान हवे. (तालुका प्रतिनिधी)