शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागभीड पोलिस ठाण्याला बदल्यांचे ग्रहण केवळ; वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:29 IST

Chandrapur : वर्षभरात तीन ठाणेदारांच्या बदल्या

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : एका ठिकाणी नियुक्ती दिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करू नये, असे संकेत आहेत. मात्र, नागभीड येथील ठाणेदारांच्या बदल्यांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास हे संकेत पायदळी तुडविल्याचे लक्षात येते.

नागभीड येथे एका वर्षात चक्क तीन ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आणि चौथ्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या पाहिल्या तर बदल्यांचे अधिकार असलेल्या वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

२०२३ च्या दुसऱ्या चरणात नागभीड पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी योगेश घारे यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच ठाणेदार योगेश घारे यांनी या ठाण्यावर चांगली पकड निर्माण केली आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले. घारे यांनी सुरू केलेली "सायरन गस्त" काहींच्या टीकेचा विषय ठरली होती. मात्र, या सायरन गस्तीमुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण नक्कीच कमी झाले होते.

मात्र, अचानक २८ जानेवारी २०२४ रोजी योगेश घारे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आणि नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून विजय राठोड यांना नियुक्त करण्यात आले. ते येथे स्थिरस्थावर होत असतानाच अवघ्या सहा महिन्यांत ठाणेदार विजय राठोड यांचे ६ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानांतरण करण्यात आले आणि अमोल काचोरे यांची नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल काचोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने काचोरे यांची आता निदान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी बदली होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अवघ्या दोन महिन्यांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ठाणेदार अमोल काचोरे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. आता नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून रमाकांत कोकाटे यांनी तत्काळ प्रभावाने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून प्रभार स्वीकारला आहे. 

तीन वर्षे तरी बदली करू नये येथील ठाणेदारांच्या पदाला लागलेले बदल्यांचे ग्रहण लक्षात घेता, हे ग्रहण येथेच संपून आणि कोकाटे यांनी पूर्ण तीन वर्षे नागभीडच्या ठाणेदारपदी कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किमान तीन वर्षे तरी ठाणेदारांची बदली करू नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर