शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग निविदा निघाल्याने आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या बहूप्रतिक्षित ब्राडगेज रेल्वे मार्गासाठी विभागाकडून निविदा मागविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.येथील रेल्वे लाईन परिसरातील जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात काहिंना नोटीस देण्यात आल्याने लवकरच या मागार्चे कामही सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी २०१४ मध्ये निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेही या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. मात्र या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात होते. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे.या कबुलीनंतर या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागार्साठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर का, होईना पण या रेल्वे मागार्साठी विभागाने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या मागार्चे तीन टप्प्यात काम होणार असून पहिल्या टप्प्यात नागभीड - भिवापूर , दुसऱ्या टप्प्यात भिवापूर - उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड - नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार असल्याची माहिती आहे.एकमेव मार्गमध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला होता. १०६ कि.मी. लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून नागपूरला येणाºया वर्धाऐवजी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे.रेल्वे विभागाने या मार्गाच्या निविदा काढल्याने हा प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. हा मार्ग चंद्रपूर , गडचिरोली या जिल्ह्यांसाठी प्रगतीमार्ग ठरणार आहे.- संजय गजपुरे, जि.प. व सल्लागार सदस्य झोन रेल्वे कमेटी.

टॅग्स :railwayरेल्वे