शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकंपनीने दिले रेल्वे विभागाला पत्र : १ डिसेंबरपासून रेल्वे बंद ठेवणार ?

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.१९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी कमी होऊ लागली. सुरूवातीला १९५२ रोजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी संसदेत करण्यात आली होती. त्यानंतर १९८२-८३ रोजी या मागणीचा पुनरूच्चार झाला होता. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. मात्र या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.मार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलणार आहे. राज्य सरकारने तशी कबुलीही दिली. या क्षेत्राचे खासदार नेते यांनी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना पण या रेल्वे मार्गासाठी संबंधित विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपणीने येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती आहे. हे गृहित धरूनच १९१३ पासून अव्याहत धावणारी ही नॅरोगेज रेल्वे गाडी बंद होणार असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कालखंडापासून सुरू असलेल्या या रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्याने काळानुसार निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. नॅरोगेज झाल्यास नागपूर-नागभीड अंतर कमी कालावधीत गाठात येईल. यामुळे संपर्काची गती वाढणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे