शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:15 IST

नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.खरे तर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ कीमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नसल्याने हा मार्ग उपेक्षेचा बळी ठरत आला आहे.दरम्यान, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने या सरकारकडून या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. या बाबीस आता साडे चार वर्षांचा कालावधी होत असला तरी या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात आहे. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलायचा आहे. आणि राज्य सरकारने तशी कबुलीही दिली आहे.खरे तर हा मार्ग केवळ गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राशीच सबंधित नाही तर नागपूर, रामटेक व भंडारा या लोकसभा क्षेत्रांशीही सबंधित आहे. याचा अर्थ नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही या मार्गाशी संबंध आहे.ना. गडकरी यांनी आपले वजन खर्च केले तर अर्थसंकल्पात निश्चितच भरीव तरतूद होण्यास वेळ लागणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात आहे.एकमेव मार्गमध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला आहे. १०६ कीमी लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते .महाप्रबंधकही संदिग्धद.पू.म.रेल्वेच्या बिलासपूर झोनचे महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांनी गुरूवारी नागभीड स्टेशनला भेट दिली असता माध्यमांनी त्यांना यासंदर्भात छेडले असता तेही याबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या रेल्वे मागाबाबत, शंकाच आहे.