शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पाच दिवसांपासून चालतोय अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर; शहरातील चौकांसह रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 18:18 IST

मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता.

ब्रह्मपुरी : शहरातील मुख्य चौक, रस्त्यावरील अतिक्रमणाविरूद्ध ब्रह्मपुरी नगरपरिषदेने १३ जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सलग पाचव्या दिवशी नगरपरिषदेची ही मोहीम सुरूच आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत, तर शहरातील मुख्य चौकांनी व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता. त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी १३ जानेवारीपासून अतिक्रमणधारकांविरूद्ध विशेष मोहीम हाती घेतली.

मागील पाच दिवसांत ब्रह्मपुरीतील शिवाजी चौक, ख्रिस्तानंद चौक, खोब्रागडे चौक, बाजारपेठ परिसरात बुलडोझरच्या साहाय्याने मुख्याधिकारी अर्शिया जुही, ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईने अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले असून, स्वत:च अतिक्रमण हटविताना दिसून येत आहेत. ही मोहीम मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्त्वात मंगेश बोंड्रे, मनोज अंबोरकर, नूतन कोरडे, उत्कर्षा माकोडे, दिलीप चिले, धर्वे, हटवार, इंदूरकर यांच्यासह ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ज्यांनी शहरातील रस्त्यावर अतिक्रमण केले असेल, त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे किंवा ज्याचे अतिक्रमण हटविले आहे. त्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करावे तसेच शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. -अर्शिया जुही, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी