शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाच दिवसांपासून चालतोय अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर; शहरातील चौकांसह रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 18:18 IST

मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता.

ब्रह्मपुरी : शहरातील मुख्य चौक, रस्त्यावरील अतिक्रमणाविरूद्ध ब्रह्मपुरी नगरपरिषदेने १३ जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सलग पाचव्या दिवशी नगरपरिषदेची ही मोहीम सुरूच आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत, तर शहरातील मुख्य चौकांनी व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता. त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी १३ जानेवारीपासून अतिक्रमणधारकांविरूद्ध विशेष मोहीम हाती घेतली.

मागील पाच दिवसांत ब्रह्मपुरीतील शिवाजी चौक, ख्रिस्तानंद चौक, खोब्रागडे चौक, बाजारपेठ परिसरात बुलडोझरच्या साहाय्याने मुख्याधिकारी अर्शिया जुही, ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईने अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले असून, स्वत:च अतिक्रमण हटविताना दिसून येत आहेत. ही मोहीम मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्त्वात मंगेश बोंड्रे, मनोज अंबोरकर, नूतन कोरडे, उत्कर्षा माकोडे, दिलीप चिले, धर्वे, हटवार, इंदूरकर यांच्यासह ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ज्यांनी शहरातील रस्त्यावर अतिक्रमण केले असेल, त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे किंवा ज्याचे अतिक्रमण हटविले आहे. त्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करावे तसेच शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. -अर्शिया जुही, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी