शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनपा अधिकारी सायकलने कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये कुतुहल : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल मोहीम

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुक्त राजेश मोहिते यांच्या पुढाकारात चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी सायकलने कार्यालय गाठले. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा २०२१ कार्यक्रम अंतर्गत प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडयातून एक दिवस आपली दुचाकी व चार चाकी वाहनांचा वापर न करता सायकलने कार्यालयात येणे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे सर्व मनपा अधिकारी, कर्मचारी सकाळी १० वाजताच्या सुमारास येथे प्रियदर्शनी चौक येथे एकत्र आले व तेथून सायकलने कार्यालयात येऊन मोहिमेची अंमलबजावणी केली.  माझी वसुंधरा अभियान २ आॅक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले असून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत, निर्सगाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे. या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला होता. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त  विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, लेखाधिकारी संतोष कंधेवार,अंतर्गत लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, सर्व अभियंता, कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांनी सायकल अभियानात सहभाग नोंदविला.  

दर शुक्रवारी आता सायकलचप्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Cyclingसायकलिंग