शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महावितरणने साधला ३२ हजार ग्राहकांसोबत थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देवीज बिलाचा संभ्रम दूर केल्याचा दावा : सर्व कार्यालयात सुरु केले तक्रार निवारण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वीज बिल दिले. मात्र यासंदर्भात मोठ्या संख्येने ग्राहकांनी शंका उपस्थित केली. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील २५ हजार ४७१ ग्राहकांनी बिलासंदर्भात तक्रार केली. या तक्रांरीचे निरासरण करण्यासाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहे.वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारनही घेतले. या माध्यमातून महावितरणने चंद्रपूर आणि गडचिरोलीतील तब्बल ३२ हजार ग्राहकांसोबत संवाद साधला आहे.महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले. ग्राहकांकडून आलेल्या बहुतांश तक्रारी दूर करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. मीटर रिडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल वीज ग्राहकांना देण्यात आले. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करून शंका निरसन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे विविध गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-१९ संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याची माहितीही महावितरण दिली.२५ हजारांवर तक्रारीलॉकडाऊनच्या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणकडे अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. यामध्ये २५ हजार ४७१ नागरिकांनी वीज बिलासंदर्भात आपल्या तक्रारी केल्या.जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणची माहिती देण्यासाठी ग्राहकांसोबत संवाद साधण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९ वॉट्सअ‍ॅप समूह तयार करून यातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे.- सुनील देशपांडे,मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

टॅग्स :mahavitaranमहावितरण