शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अर्थसंकल्पातून भारतीयांच्या 'निर्मल' आशा धुळीस मिळाल्या; खासदार बाळू धानोरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 17:57 IST

हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा असून अंमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे असे बाळू धानोरकर म्हणाले

चंद्रपूर : देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारे बजेट असून, मला पहा आणि फुले वहा असा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, मजूर वर्ग, वाढती गरिबी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. गरीबी व बेरोजगारी मुळे महागाईचे चटके गरिबांना जाणवत आहेत. प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाले पण कुणाचे? गरिबांचे की श्रीमंतांचे हे लक्षात घेतले पाहिजे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा अमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थ संकल्प आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊनच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात या घोषणा किती पूर्ण होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. 

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी

अर्थमंत्र्यांनी देशात ५० नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. मात्र, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूरचे विमानतळ अद्यापही पूर्ण झालेले नाही. केलेल्या घोषणा पूर्ण होत नसतील तर अशा अर्थसंकल्पाला काही अर्थ नाही, असेही खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत,  भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे. नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023PoliticsराजकारणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन