शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

By admin | Updated: June 27, 2015 01:32 IST

राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

बल्लारपूर : राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होऊ घातली आहे. सदर ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच कोण होणार, याचे वेध मतदारांना लागले आहे. आता बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालीने वेग घेतला असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर, नांदगाव (पोडे), पळसगाव, हडस्ती, कळमना, मानोरा, आमडी, कोर्टिमक्ता, किन्ही व गिलबिली येथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक यावर्षी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे. अशातच राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्तेही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत असून एकुण १७ जागांपैकी ९ जागेवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. पळसगावमध्ये एकुण ९ पैकी ५ जागेवर महिला उमेदवार निवडल्या जातील. किन्ही येथे एकूण ७ ग्रामपंचायत सदस्यापैकी ४ महिलासाठी राखीव आहेत. मानोरा येथे ९ पैकी ५, आमडी येथे ७ पैकी ४, कोर्टिमक्ता येथे ७ पैकी ४, कळमना येथे ९ पैकी ५, हडस्ती येथे ७ पैकी ४, नांदगाव (पोडे) येथे ११ पैकी ६ तर गिलबिली येथे ९ पैकी ५ जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत.यामुळे गावपातळीवर राजकारणात महिलांचे वर्चस्व आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ४ आॅगस्टला घेण्याचे निश्चित झाल्याने गावपातळीवरचे राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षाने उमेदवार निवडण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. प्रत्येकजण राजकारणाच्या बाता रंगविताना दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून यातील सहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसप्रणित आघाडीचे तर चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. गावातील सत्ताकारण आपल्या पक्षांकडे राहावे म्हणून काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते डावपेच आखत आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने गावातील राजकारण ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उत्साहित आहेत. (शहर प्रतिनिधी)असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रमग्रामपंचायत निवडणुकीची सुरूवात ४ जुलै रोजी नोटीस प्रसिद्धीने होणार आहे. १३ ते २० जुलै दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २१ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २३ जुलै आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान ४ आॅगस्टला सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घेतले जाणार असून मतमोजणी ६ आॅगस्टला तहसील कार्यालयात केली जाईल.सरपंच पदाचा मान या जाती प्रवर्गांना मिळणारबल्लारपूर तहसील प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढली होती. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तालुक्यातील विसापूर येथे अनुसूचित जाती महिला सरपंच होणार आहे. हडस्ती व गिलबिली येथील सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. नांदगाव (पोडे) व पळसगाव येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला सरपंच पदाचा मान मिळणार आहे. किन्ही व कळमना ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमाती महिलांना, मानोरा व आमडी ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला तर कोर्टिमक्ता ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलेच्या ताब्यात राहणार आहे. १० पैकी ६ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.