शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

मालमत्ता करवाढविरोधात आंदोलन

By admin | Updated: March 8, 2016 00:37 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे.

साखळी उपोषण : मनपाने करवाढ मागे घ्यावीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ अन्यायकारक व सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारी आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर आणखी काही मागण्यांच्या पूर्ततेकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत येथील गांधी चौकात मनपातील काँग्रेसचे नगरसेवकच आज सोमवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत.महानगरपालिकेने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून चंद्रपुरातील मालमत्तेचे सर्वेक्षण केले. मात्र हे सर्वेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आले आहे. त्यातही मनपाने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ करून चंद्रपूकरांवर अन्याय केला आहे. याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी वारंवार मनपाच्या आमसभेत प्रश्न उपस्थित करून करवाढ मागे घेण्याची मागणी केली. मात्र मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या माध्यमातून नगरसेवकांनी आंदोलन छेडले आहे. सोमवारपासून काँग्रेस नगरसेवकांनी गांधी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. आज नगरसेवक प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, राजेश यादव व सुनील बोरणे हे उपोषणाला बसले आहेत. बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम रखडत चालले आहे. याकडे पालकमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, चंद्रपुरातील झोपडपट्टीधारकांना सरकारी जमिनीचे पट्टे देण्यात यावे, इरई व झरपट नदीचे खोलीकरण करण्यात यावे व संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, चंद्रपूर पंचाशताब्दी महोत्सवानिमित्त मिळालेल्या निधीतील उर्वरित २२५ कोटी रुपये शासनाने त्वरित द्यावे व हा निधी सर्व प्रभागाच्या विकासासाठी समप्रमाणात देण्यात यावा, या मागण्याही काँग्रेस नगरसेवकांनी रेटून धरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)नागरिकांनी कर भरू नयेमनपाने नियमाला तिलांजली देत मालमत्ता करात वाढ केली आहे. नागपूरच्या महापौरांच्या घराचा टॅक्स १६०० रुपये येते. मात्र चंद्रपुरातील गरीब नागरिकाला दोन हजार रुपये गृहकर भरावा लागत आहे. ही लूटमार आणि अन्याय सहन केला जाणार नाही. यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करू, न्यायालयात जाऊ. जोपर्यंत राज्यकर्ता व न्यायपालिका न्याय देणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत नागरिकांनीही मालमत्ता कर भरू नये, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. नागपूरपेक्षा जास्त चंद्रपुरात मालमत्ता कर- पुगलियाचंद्रपूर महानगरपालिका चंद्रपुरातील मालमत्तेवर नागपूरपेक्षाही जास्त कर लादत असून चंद्रपूरच्या नागरिकांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी उपोषण मंडपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, महानगरपालिकेला जास्तीत जास्त २० टक्क्यापर्यंत मालमत्ता करात वाढ करता येते. नवीन नियमानुसार महापालिका या करात ४० टक्क्याहून जास्त वाढ करू शकत नाही. परंतु चंद्रपूर महानगरपालिकेने नियमाला तिलांजली देत मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. हे सांगताना त्यांनी काही उदाहरणेही दिली. कमरुद्दीन यांना पूर्वी ८१७ रुपये मालमत्ता कर येत होता. आता सरळ २ हजार ५२३ रुपये गृहकर आला आहे. किसन बनकर यांना पूर्वी २६४ रुपये गृहकर येत होता. त्यांनाही आता दोन हजार ६९७ रुपये गृहकर आला आहे. आपला स्वत:चा गृहकर सहापट अधिक आला आहे. आपण हा कर भरून टाकू. मात्र गरीब नागरिक असा अवाढव्य कर कसे काय भरणार आहेत, असेही पुगलिया म्हणाले. आतापर्यंत शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांनी या करवाढीवर आक्षेप घेतला आहे. ११ मार्चपर्यंत आणखी संख्या वाढणार आहे. वाहन पार्र्किंगसह अन्य काही कर मनपाने लादले आहे. यावरही पुगलिया यांनी टोला लगावला. ते म्हणाले, शासन विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. तरीही मनपा प्रशासन व पदाधिकारी विविध करात वाढ करून नागरिकांना त्रास्त देत आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अशोक नागापुरे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर, गजानन गावंडे, रत्नमाला बावने, सकीना अंसारी, देविदास गेडाम, स्वप्नील तिवारी, देवेंद्र बेले आदी उपस्थित होते.