शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

16 लाख 41 हजार 829 हजार नागरिकांना कोरोना लस देणे डोंगराएवढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे.

ठळक मुद्देलस तुटवड्याचे संकट : लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर क्षेत्र व जिल्हाभरात १७५ केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागणीनुसार कधीच पुरवठा झाला नाही. दोन दिवस झाले की केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की येत आहे. नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये आधीच्याच वयोगटाला लस मिळत नसताना केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील १६ लाख ४१ हजार ८२९ हजार पात्र नागरिकांना लस देणे आरोग्य विभागासाठी डोंगराएवढे आव्हान राहण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. १७५ लसीकरण केंद्रांमध्ये सुमारे  दोन हजार जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेवकांचाही समावेश आहे.

मागणी लाखाची पण मिळतात हजार !जिल्ह्यात दररोज सरासरी लसीकरण तीन ते चार हजार आहे. परंतु, मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे दोन दिवसातच लस  संपून जाते. दररोज १० हजार डोस मिळाले तरच लसीकरण आणखी वेगाने होऊ शकते. १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण युद्धस्तरावर राबविण्याची चंद्रपूर मनपा व जिल्हा आरोग्य प्रशासनाची तयारी आहेत.   परंतु, डोस किती मिळतात यावरच अवलंबून राहणार आहे. 

दुसऱ्या डोससाठी गोंधळ उडणारजिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून सुरू झाला. केंद्र सरकारने आता २८ दिवसांऐवजी सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांनाच दुसरा डोस पुढे गेला. त्यातच आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण घोषित झाल्याने केंद्रात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

२ लाख ९५ हजार २३ जणांनी घेतली लसजिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २ लाख ९५ हजार २३ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध मिळाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र,आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस