शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे.

ठळक मुद्देलाॅन, मंगल कार्यालयांमध्ये लगबग : बॅण्ड पथकांनाही आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून अनेक कुटुंबीयांनी आयोजित विवाह सोहळ्यांच्या तारखा पुढे ढकलल्या. सध्या थोडीफार शिथिलता मिळताच विवाह उरकण्याचा सपाटा  सुरू असून या वर्षातील सर्वाधिक विवाह पार पडण्याचा उच्चांक रविवारी ठरला. यामुळे रविवारी दिवसभर शहरात लगबग बघायला मिळाली.विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे. रविवारी शहरातील लाॅन, मंगल कार्यालये, हाॅटेल आदींमध्ये विवाह सोहळे पार पडले. सकाळच्या वेळी जिकडे जितके बॅण्डचा आवाज गुंजत होता. यामुळे मंगल कार्यालय संचालकांसह, बॅण्ड पथक, कॅटरर्स आदींचा काही प्रमाणात का होईना, फायदा झाला. चंद्रपूर येथील दाताळा मार्ग, नागपूर रोडवरील मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये सर्वाधिक लग्ने पार पडली. याशिवाय तालुकास्तरावरही लग्न पार पडले.

कोरोना नियम पायदळी- कोरोना संकटामुळे शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेशिवाय इतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विशेषत: सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंतच बाजार सुरू असतो. असे असले तरी रविवारी पार पडलेल्या लग्नसमंभामध्ये मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली. विशेषत : अनेकांनी मास्कसुुद्धा लावले नव्हते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी  दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

आषाढामध्ये विवाह?- आषाढ महिना हा पावसाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये बहुतांश जण कार्यक्रम करण्याचे टाळतात. मात्र या वर्षी इलाज नसल्यामुळे लग्न समारंभ आषाढ महिन्यात पार पाडले जात आहेत.

ग्रामीण भागात शेतकरी शेतात व्यस्त - सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या रोवणी, कपाशीचे निंदन, डवरणी, रासायनिक खत देणे आदी कामे सुरु आहे. यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतमजुरांना अतिरिक्त पैसे देवून शेतकरी शेती कामे करीत आहे. दुसरीकडे शहरामध्ये सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. विशेशत: सुटीच्या दिवशी लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे.

 

टॅग्स :marriageलग्न