शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

घराघरात बांधलेले बहुतांश शौचालय झाले स्टोअर रूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:23 IST

घरोघरी शौचालये : मात्र नागरिकांकडून वापरच नाही

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : उघड्यावर शौचाला बसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हगणदारीमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार घरोघरी शौचालये बांधण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले. मात्र, ग्रामीण जनतेची मानसिकता बदलली नसल्याने आजही ग्रामीण भागात बाहेर शौचास बसत असल्याचे दिसते.

मात्र आता ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने बाहेर शौचास जाणे जिवावर बेतणारे ठरत असल्याने भीतीपोटी का असेना, शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात शौचालयाचा वापर होत नसल्याने गावाशेजारील रस्त्यावर घाण पसरली आहे. त्यामुळे शासनाच्या हगणदारीमुक्तीचे स्वप्न नागरिकांच्या उदासीनतेमुळे भंगत असल्याचे चित्र दिसत आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने, तसेच विशेषतः महिलांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१४ पासून केंद्र शासनासोबतच राज्य शासनानेदेखील याला पाठबळ दिले. त्यामुळे शौचालयाचे महत्त्व जनतेला कळले. पंचायत समितीमार्फत शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमलात आणला गेला. विविध पुरस्कार मिळत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधीदेखील कामाला लागले. 

'नऊ दिवस नवलाईचे' या म्हणीप्रमाणे काही दिवस याचा परिणाम जनमानसात टिकून राहिला. हगणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. मात्र, पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण तालुका, जिल्हा हगणदारीमुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हगणदारीमुक्त गाव रेखांकित करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या या हगणदारीमुक्त गावाची संकल्पना आजही तालुक्यात साकारली नाही. 

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी तरी करा शौचालयाचा वापर ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गावाकरिता शौचालय बांधले. मात्र, वापर टाळला. जनतेने अनुदान मिळते म्हणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, वापर काही मोजक्या गावातच केला जात असल्याचे दिसून आले. आता ग्रामीण भागातील जनतेला शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता बदलण्याची शक्यता बळावली आहे. कारण ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असल्याने शौचास बाहेर जाणे टाळून घरी बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले टाळण्यासाठी या निमित्ताने का असेना शौचालयाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर