शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

घराघरात बांधलेले बहुतांश शौचालय झाले स्टोअर रूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:23 IST

घरोघरी शौचालये : मात्र नागरिकांकडून वापरच नाही

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : उघड्यावर शौचाला बसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हगणदारीमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार घरोघरी शौचालये बांधण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले. मात्र, ग्रामीण जनतेची मानसिकता बदलली नसल्याने आजही ग्रामीण भागात बाहेर शौचास बसत असल्याचे दिसते.

मात्र आता ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने बाहेर शौचास जाणे जिवावर बेतणारे ठरत असल्याने भीतीपोटी का असेना, शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात शौचालयाचा वापर होत नसल्याने गावाशेजारील रस्त्यावर घाण पसरली आहे. त्यामुळे शासनाच्या हगणदारीमुक्तीचे स्वप्न नागरिकांच्या उदासीनतेमुळे भंगत असल्याचे चित्र दिसत आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने, तसेच विशेषतः महिलांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१४ पासून केंद्र शासनासोबतच राज्य शासनानेदेखील याला पाठबळ दिले. त्यामुळे शौचालयाचे महत्त्व जनतेला कळले. पंचायत समितीमार्फत शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमलात आणला गेला. विविध पुरस्कार मिळत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधीदेखील कामाला लागले. 

'नऊ दिवस नवलाईचे' या म्हणीप्रमाणे काही दिवस याचा परिणाम जनमानसात टिकून राहिला. हगणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. मात्र, पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण तालुका, जिल्हा हगणदारीमुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हगणदारीमुक्त गाव रेखांकित करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या या हगणदारीमुक्त गावाची संकल्पना आजही तालुक्यात साकारली नाही. 

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी तरी करा शौचालयाचा वापर ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गावाकरिता शौचालय बांधले. मात्र, वापर टाळला. जनतेने अनुदान मिळते म्हणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, वापर काही मोजक्या गावातच केला जात असल्याचे दिसून आले. आता ग्रामीण भागातील जनतेला शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता बदलण्याची शक्यता बळावली आहे. कारण ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असल्याने शौचास बाहेर जाणे टाळून घरी बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले टाळण्यासाठी या निमित्ताने का असेना शौचालयाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर