शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:59 IST

चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उणिवा दाखविणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्दे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उणिवा दाखविणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यादरम्यान माहिती घेताना एकापेक्षा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सामान्य रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. येथील काही डॉक्टर तर सामान्य रुग्णालयात रुग्णांना आपल्याच क्लिनिकमध्ये रेफर करीत असल्याची माहिती आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची कशी गैरसोय होते, याविषयीचे सचित्र वृत्त लोकमत सातत्याने प्रकाशित करून लक्ष वेधत आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणाही अ‍ॅलर्ट झाली असून सावरासावरीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र रुग्णांची होणारी गैरसोय आजही तशीच कायम असल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले.जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोग, स्त्रीरोग, त्वचा रोग, अस्थी रोग, दंतरोग, नेत्र रोग आदींसाठी स्वतंत्र विभाग आहेत. या विभागात त्या त्या विषयाचे संबंधित तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. यातील काही डॉक्टर आपल्या कर्तव्यावर राहून मनोभावे रुग्णांची सेवा करताना दिसतात. मात्र बहुतांश डॉक्टरांनी स्वत:चे खासगी दवाखाने थाटले आहेत. त्यांची तिथेही दोन पाळ्यात धडाक्यात प्रॅक्टीस सुरू आहे. यामुळे दररोज सामान्य रुग्णालयात हजारोंच्या संख्येत येणाºया गोरगरीब रुग्णांना येथील डॉक्टर पुरेसा वेळ देऊ शकत नाही.वास्तविक येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांना शासनाकडून समाधानकारक वेतन दिले जाते. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ७ आॅगस्ट २०१२ च्या शासनपरिपत्रकानुसार शासकीय रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांना व्यवसायविरोध भत्ता दिला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयील काही डॉक्टर्स आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारीदेखील या भत्त्याची उचल करतात. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टीस करू नये, यासाठी हा भत्ता दिला जातो. मात्र काही डॉक्टर हा भत्ता उचलतात आणि त्यांची प्रॅक्टीसही सुरू असल्याची माहिती आहे.बालमृत्यूचा दर कमीच -डॉ. एम. जे. खानजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य ठिकाणावरुनही प्रसूतीसाठी महिन्याला किमान एक हजार रुग्ण दाखल होतात. यापैकी १२५ ते १५० शिशुमध्ये गर्भातील काही गंभीर आजार असतात. यामध्ये बाळ कमी दिवसाचे असणे, कमी वजनाचे असणे, आईच्या गर्भामध्ये जन्मापूर्वीच बाळाकडून विष्ठा सोडली जाणे, आॅक्सिजनचा कमी पुरवठा असणे, हृदय किंवा अन्य अवयवांची पुरेशी वाढ नसणे आदींचा समावेश असतो. प्रसुतिमध्ये हजार बालकांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर आजाराची १० ते १५ टक्के शक्यता कायम असते. याशिवाय या बालकांना दवाखान्यात पोहचण्यापर्यंत अनेक वेळा गंभीर आजारांची लागण होते. जवळपास एक हजारामध्ये २५० ते ३०० बालकांना अतिदक्षता विभागात ठेवावेच लागते. त्यामुळे हजार बालकांच्या मागे किमान २५० ते ३०० नवजात शिशूंना प्रसुतिपूर्वी व प्रसुतीनंतर धोका असतो. आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मार्फत ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, असे स्पष्टीकरण सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी लोकमतला दिले आहे.पालकमंत्र्यांकडून दखलजिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंंदीवर ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केलेली आहे. यामध्ये रुग्णालयातील धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेतली. त्यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांना मुंबईला बोलावून बैठक घेतले.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा -काँग्रेसचंद्रपूर : सामान्य रुग्णालयात सक्षम यंत्रणेच्या अभावामुळे रुग्णांची कशी गैरसोय होते, याकडे लक्ष वेधणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली. याची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात काँग्रेसजणांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत रुग्णालयातील संपूर्ण कारभाराची जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत एका समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या प्रसुती विभागात तीन महिन्यात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अतिदक्षता विभागात पायाभुत सुविधांचा अभाव आहे. या विभागात काही यंत्र हाताळणारे प्रशिक्षित नाही. रुग्णालयात कमी खाटा असल्यामुळे रुग्णांना जमिनीवर बसून उपचार घ्यावा लागतो. चंद्रपूरला मेडीकल कॉलेज होऊन तीन वर्ष होत आहेत. त्यानुसार रुग्णांना सुविधा पुरविण्यात याव्या. या सर्व समस्यांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रेय, शिवा राव, रोशन रामटेके, सी. रेमन्ड, अनिल नरुले, अरविंद मडावी व कार्यकर्ते उपस्थित होते.