शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ग्रामीण भागात शौचालयापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:40 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे.

ठळक मुद्देशौचालय वापराकडे नागरिकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागातील काही कुटूंब शौचालयाला कमी आणि मोबाईलला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे.हातात झाडू घेवून पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला, पण प्रशासनातीलकाही अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचलीच नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. परिणामी, या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून दूर आहे. शौचालयाकरिता संचित रक्कम खर्च करण्याऐवजी त्या रकमेतून मोबाईल खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा कल अधिक आहे. विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबातील मोबाईल फोन असणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक कुटुंबात शौचालय असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे घेवून जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बºयाच गावातील कुटुंबात शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावोगावी शौचालय बांधण्यात आली. शौचालयाचा वापर वाढल्याने गावात स्वच्छता दिसत होती. बारा निकषांच्या आधारावर निर्मल गावांची निवड झाली. निवड झालेल्या गावांना पुरस्कार मिळाले व विशेष निधी दिला गेला, पण त्या गावांना स्वच्छता टिकवून ठेवण्यात पाहिजे तसे यश आले नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असावे, त्याचा वापर नियमित व्हावा म्हणून जनजागृती करण्याची गरज आहे.

रस्त्याच्या कडेलाच उरकला जातो प्रात:विधीग्रामीण भागात काहींनी शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे, सरपण ठेवले जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ शौचास बसतात, घरी शौचालय असताना नागरिक त्याचा वापर न करता रस्त्यावर घाण करीत असल्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन अधिक आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असले, तरी ते सध्या कागदावरच असल्याने या योजनेला हरताळ फासल्या जात आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल