शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे जलमय : गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गावात शिरले पाणी, अनेक रस्ते बंद

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मध्यप्रदेशातील संजय सरोवर तुडुंब भरल्याने व भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ओव्हरलोड झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाची क्षमता लक्षात घेऊन मोठया प्रमाणात शुक्रवारपासून वैनगंगा नदीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठावरील गावात पाणी शिरून गावे जलमय झाली आहेत. ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे. याव्यतिरिक्त शेकडो हेक्टर धान पिकात पाणी शिरल्याने धान पिकांची नासाडी झाली आहे. तर पिंपळगाव, अऱ्हेरनवरगाव, लाडज आदी भागात भाजीपाला पिके वाहून गेली आहेत. घरांची पडझड होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे अधिकारी शर्मा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हा विसर्ग २४ तास कायम राहील, असे लोकमतला सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचारी बेलगाव, लाडज आदी भागातून बोटीद्वारे ग्रामस्थ बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. पूर ओसरल्यावर शेतीच्या नुकसानीची व घरांच्या पडझडीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेब्रह्मपुरी तालुक्यात नदीबाहेर आठ ते १० किमीपर्यंत पाणी पसरले. त्यामुळे १५ ते २० गावे पाण्याने वेढली. सदर बाब शनिवारी रात्रीच ब्रह्मपुरीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना माहीत होताच पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रात्रभर फिरून गावोगावी जाऊन लोकांना बाहेर काढले. याची माहिती ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिली. त्यांनी तातडीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाठविली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी स्वत: हजर राहून बेटाला, रणमोचन व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्ममधील अडकलेल्या ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लाडज या गावात चारही बाजूंनी पाणी शिल्याची माहिती मिळताच ठाणेदार बाळासाहेब खाडे रेस्क्यू टीमसह बोटीने गावात पोहचले. दोन बोटीमार्फत लोकांना पिंपळगावकडे पाठविण्यास सुरुवात केली. याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती. त्यांनी दोन हेलिकॉप्टर बोलावली. त्याद्वारे व बोटीने एकूण १३५० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले.३३ केव्ही उपकेंद्र पुराच्या पाण्यातगांगलवाडी : गोसेखुर्द धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वैनगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन छोटया नाल्यांना दाब आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अशातच किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. उपकेंद्रात येणाऱ्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरण ब्रम्हपुरी उपविभागाचे अधिकारी लिखार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंते वंजारी, माहुरे, मुंगुले तसेच जनमित्र थाटकर व नवघडे यांनी प्रसंगावधान राखून शनिवारी रात्री १ वाजता जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करून किन्ही उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद करून तेथे पुराच्या पाण्यात अडकलेले कार्यरत कर्मचारी यंत्रचालक व सुरक्षा रक्षक यांना सुखरूप ठिकाणी आणण्यात यश मिळविले.

टॅग्स :floodपूरriverनदी