शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे जलमय : गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गावात शिरले पाणी, अनेक रस्ते बंद

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मध्यप्रदेशातील संजय सरोवर तुडुंब भरल्याने व भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ओव्हरलोड झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाची क्षमता लक्षात घेऊन मोठया प्रमाणात शुक्रवारपासून वैनगंगा नदीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठावरील गावात पाणी शिरून गावे जलमय झाली आहेत. ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे. याव्यतिरिक्त शेकडो हेक्टर धान पिकात पाणी शिरल्याने धान पिकांची नासाडी झाली आहे. तर पिंपळगाव, अऱ्हेरनवरगाव, लाडज आदी भागात भाजीपाला पिके वाहून गेली आहेत. घरांची पडझड होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे अधिकारी शर्मा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हा विसर्ग २४ तास कायम राहील, असे लोकमतला सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचारी बेलगाव, लाडज आदी भागातून बोटीद्वारे ग्रामस्थ बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. पूर ओसरल्यावर शेतीच्या नुकसानीची व घरांच्या पडझडीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेब्रह्मपुरी तालुक्यात नदीबाहेर आठ ते १० किमीपर्यंत पाणी पसरले. त्यामुळे १५ ते २० गावे पाण्याने वेढली. सदर बाब शनिवारी रात्रीच ब्रह्मपुरीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना माहीत होताच पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रात्रभर फिरून गावोगावी जाऊन लोकांना बाहेर काढले. याची माहिती ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिली. त्यांनी तातडीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाठविली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी स्वत: हजर राहून बेटाला, रणमोचन व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्ममधील अडकलेल्या ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लाडज या गावात चारही बाजूंनी पाणी शिल्याची माहिती मिळताच ठाणेदार बाळासाहेब खाडे रेस्क्यू टीमसह बोटीने गावात पोहचले. दोन बोटीमार्फत लोकांना पिंपळगावकडे पाठविण्यास सुरुवात केली. याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती. त्यांनी दोन हेलिकॉप्टर बोलावली. त्याद्वारे व बोटीने एकूण १३५० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले.३३ केव्ही उपकेंद्र पुराच्या पाण्यातगांगलवाडी : गोसेखुर्द धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वैनगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन छोटया नाल्यांना दाब आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अशातच किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. उपकेंद्रात येणाऱ्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरण ब्रम्हपुरी उपविभागाचे अधिकारी लिखार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंते वंजारी, माहुरे, मुंगुले तसेच जनमित्र थाटकर व नवघडे यांनी प्रसंगावधान राखून शनिवारी रात्री १ वाजता जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करून किन्ही उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद करून तेथे पुराच्या पाण्यात अडकलेले कार्यरत कर्मचारी यंत्रचालक व सुरक्षा रक्षक यांना सुखरूप ठिकाणी आणण्यात यश मिळविले.

टॅग्स :floodपूरriverनदी