शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

माकडांचा धुमाकूळ वनविभाग सुस्त

By admin | Updated: January 10, 2016 01:16 IST

गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले.

महिला व बाल वर्गात भीती : बंदोबस्त लावण्याची नागरिकांची मागणीब्रह्मपुरी : गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले. तसेच वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरील उपाययोजनेसाठी वनविभाग मात्र सुस्त असल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.पूर्वी माकडे गावात यायची व कालांतराने जंगलात निघुन जायची. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास होत नव्हता. परंतु अलिकडे गेल्या वर्षभरापासून माकडांनी मोबाईल टॉवरवर आपले बस्तान मांडले असल्याने माकडे रात्रभर टॉवरवर मुक्काम ठोकतात आणि दिवसभर शहरात धुमाकूळ घालतात. विशेष म्हणजे मोबाईल टॉवर बेवारस आहेत. या ठिकाणी साधा चौकीदारदेखील नाही. त्यामुळे टॉवरवर माकडांसह अन्य प्राण्यांचे बस्तान दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिकेने अशा बेवारस टॉवरवर कार्यवाहीचा बडगा उगारून किमान चौकीदार ठेवण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. असे केल्यास ते ठिकाण सुरक्षित राहील. दिवस उजाडताच माकडांचा उद्पव्याप सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना हातचे काम सोडून त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करावी लागते. त्यातच नागरिकांचा वेळ जात आहे. विशेषत: महिला व बालकांना धोका निर्माण झाला असून देलनवाडी वॉर्डात या माकडांना त्यांच्यावर हमला करण्याइतपत मजल माकडांनी देलनवाडी वार्डात केली आहे. पुढे माकडांना घाबरून एखादी अनुचीत घटना घडू शकते. त्यामुळे ब्रह्मपुरीकर सध्या धास्तावले आहे. वनविभागाचे डझनभर कर्मचारी या कामांवर काही दिवस नियुक्ती केल्यास त्यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देऊ शकतात पण मनात अद्यापही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हा प्रश्न गांभीर्याने आला नसल्याने सदर बाब वेळोवेळी नागरिकांनी आणून दिली असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. एखादी अनुचीत घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा वनविभागाच्या विरोधात नागरिकांचा तिव्र संतापाचा भडका होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)