शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

माकडांचा धुमाकूळ वनविभाग सुस्त

By admin | Updated: January 10, 2016 01:16 IST

गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले.

महिला व बाल वर्गात भीती : बंदोबस्त लावण्याची नागरिकांची मागणीब्रह्मपुरी : गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले. तसेच वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरील उपाययोजनेसाठी वनविभाग मात्र सुस्त असल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.पूर्वी माकडे गावात यायची व कालांतराने जंगलात निघुन जायची. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास होत नव्हता. परंतु अलिकडे गेल्या वर्षभरापासून माकडांनी मोबाईल टॉवरवर आपले बस्तान मांडले असल्याने माकडे रात्रभर टॉवरवर मुक्काम ठोकतात आणि दिवसभर शहरात धुमाकूळ घालतात. विशेष म्हणजे मोबाईल टॉवर बेवारस आहेत. या ठिकाणी साधा चौकीदारदेखील नाही. त्यामुळे टॉवरवर माकडांसह अन्य प्राण्यांचे बस्तान दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिकेने अशा बेवारस टॉवरवर कार्यवाहीचा बडगा उगारून किमान चौकीदार ठेवण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. असे केल्यास ते ठिकाण सुरक्षित राहील. दिवस उजाडताच माकडांचा उद्पव्याप सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना हातचे काम सोडून त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करावी लागते. त्यातच नागरिकांचा वेळ जात आहे. विशेषत: महिला व बालकांना धोका निर्माण झाला असून देलनवाडी वॉर्डात या माकडांना त्यांच्यावर हमला करण्याइतपत मजल माकडांनी देलनवाडी वार्डात केली आहे. पुढे माकडांना घाबरून एखादी अनुचीत घटना घडू शकते. त्यामुळे ब्रह्मपुरीकर सध्या धास्तावले आहे. वनविभागाचे डझनभर कर्मचारी या कामांवर काही दिवस नियुक्ती केल्यास त्यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देऊ शकतात पण मनात अद्यापही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हा प्रश्न गांभीर्याने आला नसल्याने सदर बाब वेळोवेळी नागरिकांनी आणून दिली असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. एखादी अनुचीत घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा वनविभागाच्या विरोधात नागरिकांचा तिव्र संतापाचा भडका होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)