शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तहान भागविण्यासाठी मोजावे लागते पैसे

By admin | Updated: May 23, 2014 23:44 IST

तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले.

चिमूर: तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले. तहानलेल्यांना पाणी देण्याची भावनाच लुप्त झाली असे नाही तर पाणपोई कमी होण्यास बॉटल संस्कृती एक कारण ठरत आहे. जीवनात पाण्याला महत्त्व आहे. शास्त्रात पाण्यालाच जीवन म्हटले आहे. पाप- पुण्य जरी कथेच्या गोष्टी असल्या तरी, तहानेने व्याकूळ झालेल्यांला पाणी मिळाल्यास त्याची तृष्णा भागून त्याला मिळणारी तृप्ती ही काही कोण्या पुण्यापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात वाढत असलेल्या पार्‍यात कुणालाही कुठेही पाण्याची गरज भासते. यामुळे पूर्वी रस्त्यावर मोठ्या चौकात व रहदारी असलेल्या भागात अनेक ठिकाणी पाणपोई लावल्या जात होत्या. मात्र आता पाणपोई दिसेनाशा झाल्या आहेत. भर उन्हात जर तहान लागली तर ती भागविण्यासाठी बिसलरी बॉटल विकत घेऊनच तहान भागविण्याची वेळ आज आली आहे. यात ज्यांच्या खिशात पैसा आहे त्यांच्याकरिता हे शक्य आहे. मात्र चिमूर बाजारहाटाकरिता आलेल्या बाहेर गावातील गरजवंताना हे अडचणीचे ठरत आहे. बॉटल संस्कृती वाढल्याने पाणपोई हटविली जात आहे. पाणपोई कमी होण्यामागे वाढती बॉटल संस्कृती एक कारण आहे. शिवाय ठिकठिकाणी मिनरल वॉटर, पाणी पाऊच मिळत असल्याने तहानलेल्यांना त्या मिळत आहेत. मात्र यासाठी पैसा मोजावा लागत आहे.. (तालुका प्रतिनिधी)