शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

तहान भागविण्यासाठी मोजावे लागते पैसे

By admin | Updated: May 23, 2014 23:44 IST

तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले.

चिमूर: तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले. तहानलेल्यांना पाणी देण्याची भावनाच लुप्त झाली असे नाही तर पाणपोई कमी होण्यास बॉटल संस्कृती एक कारण ठरत आहे. जीवनात पाण्याला महत्त्व आहे. शास्त्रात पाण्यालाच जीवन म्हटले आहे. पाप- पुण्य जरी कथेच्या गोष्टी असल्या तरी, तहानेने व्याकूळ झालेल्यांला पाणी मिळाल्यास त्याची तृष्णा भागून त्याला मिळणारी तृप्ती ही काही कोण्या पुण्यापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात वाढत असलेल्या पार्‍यात कुणालाही कुठेही पाण्याची गरज भासते. यामुळे पूर्वी रस्त्यावर मोठ्या चौकात व रहदारी असलेल्या भागात अनेक ठिकाणी पाणपोई लावल्या जात होत्या. मात्र आता पाणपोई दिसेनाशा झाल्या आहेत. भर उन्हात जर तहान लागली तर ती भागविण्यासाठी बिसलरी बॉटल विकत घेऊनच तहान भागविण्याची वेळ आज आली आहे. यात ज्यांच्या खिशात पैसा आहे त्यांच्याकरिता हे शक्य आहे. मात्र चिमूर बाजारहाटाकरिता आलेल्या बाहेर गावातील गरजवंताना हे अडचणीचे ठरत आहे. बॉटल संस्कृती वाढल्याने पाणपोई हटविली जात आहे. पाणपोई कमी होण्यामागे वाढती बॉटल संस्कृती एक कारण आहे. शिवाय ठिकठिकाणी मिनरल वॉटर, पाणी पाऊच मिळत असल्याने तहानलेल्यांना त्या मिळत आहेत. मात्र यासाठी पैसा मोजावा लागत आहे.. (तालुका प्रतिनिधी)