शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

टाकाऊ साहित्यातून बनविलेले ‘आधुनिक फवारणी यंत्र’ ठरतेय फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:04 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : या यंत्राला पाठीवर किंवा खांद्यावर घ्यायची गरज नाही. 

- प्रा. अशोक डोईफोडे ( चंद्रपूर)

पारंपरिक फवारणी यंत्राने फवारणी करताना, शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. यात शारीरिक कष्ट तसेच आरोग्याचा प्रश्नही असतो. या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर  येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या (एम.सी.व्ही.सी.) प्रा. माधुरी पेटकर यांनी टाकाऊ साहित्यापासून ‘आधुनिक फवारणी यंत्र’ तयार केले आहे. जे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरत आहे. या यंत्राला पाठीवर किंवा खांद्यावर घ्यायची गरज नाही. 

पारंपरिक फवारणी यंत्र सतत खांद्यावर घेऊन राहावे लागत असल्यामुळे खांदे निकामी होणे, मणक्याचा त्रास होणे, शरीरावर वजन येत असल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. औषधीची टँक पाठीवर आणि नोझल नाकाजवळ असल्यामुळे घातक रसायने नाकाद्वारे शरीरात जातात. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून, काही जणांचा तर मृत्यूही झाला आहे. याशिवाय पारंपरिक फवारणी यंत्राची किंमतही अधिक आहे. साधा पंप दोन हजार रुपये, तर इलेक्ट्रिक पंपची किंमत तीन हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे हे पंप शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

प्रा. पेटकर यांनी शोधलेल्या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर किंवा खांद्यावर ताण पडत नाही. शारिरीक कष्टही घ्यावे लागत नाही. टँक आणि नोझल मानसापासून लांब अंतरावर असल्यामुळे घातक रसायने शरीरात जात नाही. यात विशेष बाब अशी की, या यंत्रामध्ये एकापेक्षा जास्त नोझल वापरलेले असल्याने एकाच वेळी चार ते सहा सरींची सोयीस्करपणे फवारणी केली जाऊ शकते.. तसेच हे यंत्र तयार करण्यासाठी जास्तीत जास्त तीन हजार रुपये खर्च येतो. कमी किंमतीत वेळ व श्रम वाचविणारे हे यंत्र असून  शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी