शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: October 31, 2015 01:52 IST

भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन ....

पुगलिया यांचा घणाघाती आरोप : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसाठी पंतप्रधानांना निवेदनचंद्रपूर : भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.चंद्रपूर जिल्हा विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी स्थानिक गांधी चौकात डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, उषा धांडे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रशेखर पोडे, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, नासिर खान, मजदूर सभेचे महासचिव वसंतराव मांढरे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन साईनाथ बुचे यांनी तर आभार गजानन गावंडे यांनी मानले.या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत नरेश पुगलिया यांनी विद्यमान सरकारच्या धोरणावरही टीका केली. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी व शेती उत्पादनाला आधारभूत मूल्य मिळावे म्हणून नोव्हेंबर २००४ मध्ये डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्यात शेतमालाला हमीभाव देण्याची शिफारस करण्यात आली. मात्र सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. मदतही मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)