शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा आरोप : साखरी येथील उपोषणस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या. २०१२ च्या हस्तांतर कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना मोबदला व नोकरी देण्याचे करारनाम्यात नमूद आहे. मात्र वेकोलि प्रशासन रेडीरेक्नरचा आधार घेत प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी दिला.बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या पौनी कोळसा खाण क्रमांक २ व ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले. मात्र वेकोली प्रशासन अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. आंदोलनाला तीव्र करण्याच्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी साखरी येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया बोलत होते.यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे, नगरसेवक अशोक नागापूरे माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, उमाकांत धांडे, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, शेषराव बोंडे, कैलास उरकुडे, कवडू पोटे, रामदास वाग्दरकर यांची उपस्थिती होती.यावेळी नरेश पुगलिया पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. वेकालि एका एकर जमिनीतून २५ ते ३० कोटी रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करते. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्तांना एकरी सहा ते १० लाख रुपये मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे.मात्र वेकालि प्रशासन शेतकºयांच्या तोडाला पाने पुसण्याचा प्रकार करीत आहे. जमिनीच्या मालकाला देशोघडीला लावत आहे. न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे.संघर्ष करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उत्तम बोबडे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.