शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा आरोप : साखरी येथील उपोषणस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या. २०१२ च्या हस्तांतर कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना मोबदला व नोकरी देण्याचे करारनाम्यात नमूद आहे. मात्र वेकोलि प्रशासन रेडीरेक्नरचा आधार घेत प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी दिला.बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या पौनी कोळसा खाण क्रमांक २ व ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले. मात्र वेकोली प्रशासन अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. आंदोलनाला तीव्र करण्याच्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी साखरी येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया बोलत होते.यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे, नगरसेवक अशोक नागापूरे माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, उमाकांत धांडे, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, शेषराव बोंडे, कैलास उरकुडे, कवडू पोटे, रामदास वाग्दरकर यांची उपस्थिती होती.यावेळी नरेश पुगलिया पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. वेकालि एका एकर जमिनीतून २५ ते ३० कोटी रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करते. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्तांना एकरी सहा ते १० लाख रुपये मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे.मात्र वेकालि प्रशासन शेतकºयांच्या तोडाला पाने पुसण्याचा प्रकार करीत आहे. जमिनीच्या मालकाला देशोघडीला लावत आहे. न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे.संघर्ष करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उत्तम बोबडे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.