शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबतच्या अफवांमुळे पसरताहेत गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ७९-८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी इतरांना संसर्ग होत असतो. त्यांच्यातही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत गुंतागुंत होवून मृत्यू होवू शकतो. २०-२५ टक्के लोकांत सौम्य ते मध्यम लक्षणे व ५-१० टक्के लोकांमध्ये गंभीर लक्षणे आढळतात. २-३ टक्के रूग्णांचा मृत्यु होतो.

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करा-जिल्हाधिकारी : समाजमाध्यमांवर अफवांवर पसरविण्यांवर कारवाईच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोना विषाणू संदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरल्या जात आहेत. यापुढे अशा अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता स्वत:ची, कुटुंबाची व इतरांची काळजी घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आहे.कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ७९-८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी इतरांना संसर्ग होत असतो. त्यांच्यातही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत गुंतागुंत होवून मृत्यू होवू शकतो. २०-२५ टक्के लोकांत सौम्य ते मध्यम लक्षणे व ५-१० टक्के लोकांमध्ये गंभीर लक्षणे आढळतात. २-३ टक्के रूग्णांचा मृत्यु होतो.वयोवृद्ध व मधुमेह, हृदयरोग, किडनी निकामी असणे व इतर गंभीर आजार असल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या समूह संसर्गाची अवस्था असल्याने रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. उशिरा तपासणी व निदानामुळे गंभीर स्थिती होवून उपचाराला प्रतिसाद मिळत नाही.इतर गंभीर आजार असले तरच मृत्यू संख्या वाढत आहे. आयुष मंत्रालयाचे मार्गदर्शक सुचनांनुसार आयुष काढा किंवा तत्सम औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना किंवा इतर सांसर्गीक आजारांचा प्रतिबंध करण्यास किंवा तीव्रता टाळण्यास मदत होते. मात्र त्यामुळे अति आत्मविश्वासाने दक्षता न घेतल्यास संसर्ग होवू शकतो, याकडेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी लक्ष वेधले आहे.अशा आहेत अफवाकोरोना हा आजारच नाही, ते एक जागतिक षडयंत्र आहे. कोरोनाने कुणाचाच मृत्यू होत नाही. कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोनाने मृत्यू झाल्यास डॉक्टरला दीडलाख रूपये मिळतात. पेशंटचे लिव्हर,किडनी काढून विकतात व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावतात. काढा किंवा तत्सम औषधे सातत्याने घेतल्यास कोरोना संसर्ग होवूच शकत नाही. पावसात भिजणे, आंबट खाल्ल्याने ताप व खोकला झाला म्हणून कोविड तपासणी करायची गरज नाही. स्वत:ला माहिती असलेल्या औषधांनीच ठीक होईल. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास लुट करतील. इतर रूग्णांपासून अधिक संसर्ग होवून रूग्णाकडे दुर्लक्ष करतील, अशाप्रकारच्या समाज माध्यमांमध्ये अफवा पसरविल्या जात आहेत.अशी आहे वास्तविकताकोरोना रूग्णासाठी दीडलाख रूपये मिळतात हीअफवा आहे. शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक औषध खरेदीसाठीच निधी उपलब्ध होतो. शासकीय किंवा खासगी डॉक्टरांना रूग्ण पॉझिटिव्ह दाखविल्याने किंवा रूग्णाचा मृत्यु झाल्यावर दीडलाख रूपये मिळत नाही. किडनीसारखे अवयव काढतात ही तर निंदणीय अफवा आहे. कोरोना बाधित रूग्णाचे शवविच्छेदन करण्यास मनाई आहे. मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते. त्यांचा अंत्यविधी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच केल्या जातो. कोरोना बाधित रूग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.ताप, खोकला असला तरी करा चाचणीइतर कारणांनीही ताप, खोकला होवू शकतो. मात्र, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाची शक्यता गृहीत धरून टेस्ट करावी. स्वत: निदान करून स्वत:च औषधोपचार घेणे अतिशय गंभीर आहे. यामुळे कोरोना संसर्ग असल्यास उशिर होवून योग्य उपचाराअभावी धोका होवू शकतो. रूग्णसंख्येच्या मानाने संसाधने व मनुष्यबळ अपुरे वाटत असले तरी प्रशासनाकडून तातडीने सुविधा निर्माण केल्या जात आहेत. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या