शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

यमुनामायच्या वंशजांची मंत्र्यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:52 IST

गोंड राजांनी उभारलेल्या महाकाली मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविकांना चंद्रपूरात आणण्याची परंपरा १८६० च्या कालखंडामध्ये यमुनामायने सुरू केली.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : महाकाली यात्रेतील भाविकांना सुविधा पुरविण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंड राजांनी उभारलेल्या महाकाली मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविकांना चंद्रपूरात आणण्याची परंपरा १८६० च्या कालखंडामध्ये यमुनामायने सुरू केली. मात्र मंदिर व्यवस्थापन कमिटीकडून भाविकांना सुविधा पुरविली जात नाही, अशी खंत यमुनामायच्या वंशजांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. ‘यमुनामायच्या धाडसाने चंद्रपूरवारी’ या शिषर्काखाली शुक्रवारी वृत्त प्र्रकाशित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी वंशजांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूर असा ४५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून १८६० मध्ये यमुनामाय शेकडो भाविकांसह माता महाकाली दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाल्या होत्या.तेव्हापासून हयात असेपर्यंत यात्रेची वारी सुरू ठेवली. ही परंपरा आजही सुरू आहे. राणी हिराईने महाकाली मंदिराची व्याप्ती वाढली. राणीच्या धार्मिक व सामाजिक कार्याने महाकाली यात्रेचे महत्त्व वाढले. यमुनामायच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. यमुनामायचे वंशज माधव नरबाजी उट्टलवाड, गोविंद महाराज माधव, नरहरी माधव, सुनील माधव, सुनील गोविंद, अनिल गोविंद दरवर्षी शेकडो भाविकांसह महाकाली यात्रेत येतात.१८ व्या शतकातील यमुनामायच्या स्मृती कायम राहावी, म्हणून यात्रेची वारी केली जात आहे. ‘यमुनामाय’ याच नावाने हा वारसा पुढे नेला जात आहे. हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेसाठी येतात. यात्रेकरूंची गैरसोय होते, अशी खंत गोविंद महाराज यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ ने या समस्येला वाचा फोडली. दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी आज महाकाली मंदिराच्या परिसरात दाखल झाले. यमुनामायच्या वंशज ९५ वर्षीय यमुनामाय, गोविंद महाराज व उट्टलवाड कुटुंबीयांची भेट घेवून १८ व्या शतकातील ऐतिहासिक संदर्भ जाणून घेतले.भाविकांच्या मूलभूत समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी ना. अहीर म्हणाले, माता महाकालीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक येतात. त्यामुळे यात्रेला कीर्ती मिळाली.पुढील वर्षी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. शिवाय, यमुनामायच्या वंशजांचा हीसन्मान कायम ठेवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.अनेक वर्षांपासून महाकाली देवीच्या दर्शनासाठी आम्ही येत आहोत. यमुनामायचे वंशज म्हणून आम्हाला विशेष वागणूक नको. परंतु भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाने सोयीसुविधा पुरविल्या पाहिजे. आमची व्यथा ‘लोकमत’ ने मांडली. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यात्रा परिसरात येऊन समस्या जाणून घेतल्या. हा क्षण कायम स्मरणात राहणारा आहे.- गोविंद महाराजयमुनामायचे वंशज, नांदेड