शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मिनी मंत्रालय करणार १२ लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:06 IST

महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनियोजन पूर्ण : जनजागृतीसाठी वृक्षदिंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जि. प. पदाधिकारी व अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील दोन गावात जाऊन वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षलागवड गावातील स्मशानभूमी, रस्त्याच्या दुतर्फा, गावातील खुल्या जागा, शाळा, अंगणवाडीचे आवार, गावातील मोकळे चौक, याशिवाय गावातील शासकीय दवाखाने, शासकीय इमारतीच्या मोकळ्या जागामध्ये केली जाईल. तसेच गावस्तरावर या कामात पुरेपुर लोकसहभाग मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांची सभा घेऊन वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे, नरेगामधून वृक्षरोपणासाठी खड्डे खोदकाम करण्याची कामे सुरू आहेत, अशी माहतीही भोंगळे यांनी दिली.वनमंत्र्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभवृक्षरोपणाचा कार्यक्रम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता ‘वृक्षदिंडी २०१८’ चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते २७ जूनला या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. याद्वारा वृक्षरोपण व वृक्ष जगविण्याकरिता व वृक्षरोपणाचे महत्त्व गावागावातील नागरिकांना माहित व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वृक्षदिंडी गावागावात फिरवली जाणार असून गावस्तरावर याद्वारे वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे.