शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 12, 2016 03:35 IST

गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या

नागभीड : गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून निघणारे पाण्यामुळे राज्य महामार्गालगत खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नागभीड ग्रामपंचायत प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. ही जलवाहिनी तातडीने दुरूस्त करून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. नागभीड शहरातील जलकुंभाला पाणी पुरवठा करण्यासाठी नागभीड - नागपूर महामार्गावर विहीर व पंपहाऊस आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंपहाऊस जवळील मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच फुटलेल्या जलवाहिनीतून निघणाऱ्या पाण्याने खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा राज्य महामार्गाला लागून असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जलवाहिनीतून वाया जाणाऱ्या पाण्याने जलकुंभ भरण्याकरिता वेळ लागत असल्याने विद्युत खर्चसुद्धा वाढत आहे. पाणीपट्टी कर व विद्युत कर आकारणीचे माध्यमातून हा संपूर्ण खर्च नागरिकांकडून वसुल होत असल्याने येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे नळाला कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करित असल्याने रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. जनतेला पाण्याचे महत्व सांगणारे ग्रामपंचायत प्रशासनाची अवस्था दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण अशीच झाली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागभीडकरांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)