शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

लॉकडाऊनमुळे उद्योगांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गेली नाही तर आर्थिक नुकसानीचा हा आकडा किमान ७५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता त्यानी वर्तविली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योग पूर्णत: बंद आहेत. यामुळे उद्योजक व कामगारांचेही प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगांचे अंदाजे ४०० कोटी व जीएसटीच्या माध्यमातून शासनाचे ७० कोटी व इतर ३० कोटी असे अंदाजित ५०० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. चार सिमेंट, एक पेपरमिल, खासगी वीज प्रकल्प व पोलाद उद्योगही बंद असल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे.औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. रोजगार निर्माण करणारे छोटे-मोठे अनेक उद्योग आहेत. यामध्ये एसीसी, अंबुजा, एल अँड टी व माणिकगड सिमेंट कारखाना, बल्लारपूर पेपर मिल, पोलाद उद्योग, वर्धा पॉवर, जीएमआर, धारीवाल, खासगी वीज प्रकल्प, वेकोलिच्या ३० कोळसा खाणी, कोल वॉशरीज या मोठ्या उद्योगासोबतच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे राज्य सरकारचा उपक्रम तसेच चंद्रपूर, ताडाळी, वरोरा, भद्रावती, मूल या औद्योगिक वसाहतीतील छोट्या उद्योगांमुळे रोजगार उपलब्ध झाला होता. परंतू, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाची वाढ होऊ नये, यासाठी २२ मार्च २०२० रोजी टाळेबंदी जाहीर झाल्यापासून हे बंद ठेवण्यात आले आहेत. या टाळेबंदीला २१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सलग उद्योग बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गेली नाही तर आर्थिक नुकसानीचा हा आकडा किमान ७५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता त्यानी वर्तविली. जिल्ह्यातील उद्योगांनी यापूर्वी अशा प्रकारचे आर्थिक नुकसान कधीच न झाल्याने छोटे उद्योग बंद पडण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करावे- मधुसुधन रूंगठाजिल्ह्यातील उद्योगांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उद्योगांची बँक मर्यादा पूर्ण वापरण्यात आली आहे. मात्र, उद्योगच बंद असल्याने त्यांच्या ग्राहकांकडून पैसे मिळत नाहीत. अत्यंत अडचणी सापडलेल्या जिल्ह्यातील उद्योगांसाठी सरकारने आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकार प्रोत्साहन पॅकेज योजनेद्वारे उद्योगांना प्रोत्साहन उद्योगांच्या एक वर्षासाठी कार्यरत भांडवलावर पाच टक्के व्याज सवलत तसेच पगार, वीज शुल्क संबंधित खर्चाची भरपाई व उद्योगांच्या संरक्षणासाठी एक कमिटी गठित करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक