शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

लॉकडाऊनमुळे उद्योगांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गेली नाही तर आर्थिक नुकसानीचा हा आकडा किमान ७५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता त्यानी वर्तविली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योग पूर्णत: बंद आहेत. यामुळे उद्योजक व कामगारांचेही प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगांचे अंदाजे ४०० कोटी व जीएसटीच्या माध्यमातून शासनाचे ७० कोटी व इतर ३० कोटी असे अंदाजित ५०० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. चार सिमेंट, एक पेपरमिल, खासगी वीज प्रकल्प व पोलाद उद्योगही बंद असल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे.औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. रोजगार निर्माण करणारे छोटे-मोठे अनेक उद्योग आहेत. यामध्ये एसीसी, अंबुजा, एल अँड टी व माणिकगड सिमेंट कारखाना, बल्लारपूर पेपर मिल, पोलाद उद्योग, वर्धा पॉवर, जीएमआर, धारीवाल, खासगी वीज प्रकल्प, वेकोलिच्या ३० कोळसा खाणी, कोल वॉशरीज या मोठ्या उद्योगासोबतच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे राज्य सरकारचा उपक्रम तसेच चंद्रपूर, ताडाळी, वरोरा, भद्रावती, मूल या औद्योगिक वसाहतीतील छोट्या उद्योगांमुळे रोजगार उपलब्ध झाला होता. परंतू, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाची वाढ होऊ नये, यासाठी २२ मार्च २०२० रोजी टाळेबंदी जाहीर झाल्यापासून हे बंद ठेवण्यात आले आहेत. या टाळेबंदीला २१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सलग उद्योग बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गेली नाही तर आर्थिक नुकसानीचा हा आकडा किमान ७५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता त्यानी वर्तविली. जिल्ह्यातील उद्योगांनी यापूर्वी अशा प्रकारचे आर्थिक नुकसान कधीच न झाल्याने छोटे उद्योग बंद पडण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करावे- मधुसुधन रूंगठाजिल्ह्यातील उद्योगांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उद्योगांची बँक मर्यादा पूर्ण वापरण्यात आली आहे. मात्र, उद्योगच बंद असल्याने त्यांच्या ग्राहकांकडून पैसे मिळत नाहीत. अत्यंत अडचणी सापडलेल्या जिल्ह्यातील उद्योगांसाठी सरकारने आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकार प्रोत्साहन पॅकेज योजनेद्वारे उद्योगांना प्रोत्साहन उद्योगांच्या एक वर्षासाठी कार्यरत भांडवलावर पाच टक्के व्याज सवलत तसेच पगार, वीज शुल्क संबंधित खर्चाची भरपाई व उद्योगांच्या संरक्षणासाठी एक कमिटी गठित करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक