शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही.

ठळक मुद्देपाणीकर थकबाकी प्रकरण : सिंचन विभागाकडून वसुलीच्या नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर पालिकेकडून सिंचन विभागाशी करार न करताच इरई धरणातून पाण्याची उचल करत आहेत. हा करार केल्यास पाण्याची उचल केलेल्या रिडींगप्रमाणेच पाणीकर लागू करण्याबाबत सिंचन विभागाने अनेकदा नोटिसा पाठविल्या. मात्र, मनपाकडून याकडे कानाडोळा केले जात आहे. परिणामी, कराराअभावी मनपाला कोट्यवधींचा पाणीकर भुर्दंड बसत आहे.महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही. हा करार झाला असता तर धरणातून पाणी उचल केलेल्या प्रमाणानुसारच सिंचन विभागाला पाणीकर वसुल करावा लागतो. मात्र, सिंचन विभागाने अनेकदा नोटीसा पाठवूनही मनपाने या विभागाशी अद्याप करार केला नाही. त्यामुळे १२ महिन्यांत १२ दलघमी पाणी उचल झाल्याचे गृहित धरून सिंचन विभागाकडून कर आकारला जात आहे. सद्यस्थितीत महानगर पालिकेकडे ६ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे सिंचन विभागाकडून महापालिकेला थकबाकी जमा करण्याच्या नोटीसा पाठविल्या जातात. तर दुसरीकडे आम्ही एवढ्या पाण्याची उचल केली नाही, असा पवित्रा मनपाकडून घेतला जात आहे. परंतु, मूळ समस्या जैसे थे असूनही मनपाने करार करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाही. सिंचन विभागाने पाणीकर वसूल करण्याबाबत नोटीस जारी केल्यानंतर मनपाकडून प्रतिदावा केला जातो. त्यानंतर बैठका होतात मनपा प्रशासन काही रक्कम अदा करते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. करार न करण्याच्या कारणांबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, महापौर राखी कंचर्लावार यांना विचारले असता याबाबत आयुक्त माहिती देऊ शकतील, असे सांगितले.करार झाला असता तर...चंद्रपूर शहराला दरमहिन्याला पिण्याचे पाणी किती दलघमी लागते आणि धरणातून किती पाण्याची उचल होते, यासंदर्भात करारात स्पष्ट नमुद केले जाते. त्यासाठी पाणी उचल करण्याचे मीटर व अन्य तांत्रिक सामग्री करार करणाऱ्यांकडून लावली जाते. मात्र, मनपाने अशा प्रकाराचा सिंचन विभागासोबत असा करारच केला नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीवरून नोटीसा पाठविण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत.मुख्य लेखा परीक्षकांकडून ताशेरेपाणी कराबाबत चंद्रपूर मनपाने सिंचन विभागाशी अद्याप करार न केल्याने करवसुलीचा प्रश्न वादग्रस्त झाला. गतवर्षी याच प्रश्नावरून औरंगाबाद येथील मुख्य जललेखा परीक्षकांनी कडक ताशेरे ओढले होते. शिवाय करार न करता मोघम पद्धतीने पाणी उचल करणाºया मनपाचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका