शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही.

ठळक मुद्देपाणीकर थकबाकी प्रकरण : सिंचन विभागाकडून वसुलीच्या नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर पालिकेकडून सिंचन विभागाशी करार न करताच इरई धरणातून पाण्याची उचल करत आहेत. हा करार केल्यास पाण्याची उचल केलेल्या रिडींगप्रमाणेच पाणीकर लागू करण्याबाबत सिंचन विभागाने अनेकदा नोटिसा पाठविल्या. मात्र, मनपाकडून याकडे कानाडोळा केले जात आहे. परिणामी, कराराअभावी मनपाला कोट्यवधींचा पाणीकर भुर्दंड बसत आहे.महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही. हा करार झाला असता तर धरणातून पाणी उचल केलेल्या प्रमाणानुसारच सिंचन विभागाला पाणीकर वसुल करावा लागतो. मात्र, सिंचन विभागाने अनेकदा नोटीसा पाठवूनही मनपाने या विभागाशी अद्याप करार केला नाही. त्यामुळे १२ महिन्यांत १२ दलघमी पाणी उचल झाल्याचे गृहित धरून सिंचन विभागाकडून कर आकारला जात आहे. सद्यस्थितीत महानगर पालिकेकडे ६ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे सिंचन विभागाकडून महापालिकेला थकबाकी जमा करण्याच्या नोटीसा पाठविल्या जातात. तर दुसरीकडे आम्ही एवढ्या पाण्याची उचल केली नाही, असा पवित्रा मनपाकडून घेतला जात आहे. परंतु, मूळ समस्या जैसे थे असूनही मनपाने करार करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाही. सिंचन विभागाने पाणीकर वसूल करण्याबाबत नोटीस जारी केल्यानंतर मनपाकडून प्रतिदावा केला जातो. त्यानंतर बैठका होतात मनपा प्रशासन काही रक्कम अदा करते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. करार न करण्याच्या कारणांबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, महापौर राखी कंचर्लावार यांना विचारले असता याबाबत आयुक्त माहिती देऊ शकतील, असे सांगितले.करार झाला असता तर...चंद्रपूर शहराला दरमहिन्याला पिण्याचे पाणी किती दलघमी लागते आणि धरणातून किती पाण्याची उचल होते, यासंदर्भात करारात स्पष्ट नमुद केले जाते. त्यासाठी पाणी उचल करण्याचे मीटर व अन्य तांत्रिक सामग्री करार करणाऱ्यांकडून लावली जाते. मात्र, मनपाने अशा प्रकाराचा सिंचन विभागासोबत असा करारच केला नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीवरून नोटीसा पाठविण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत.मुख्य लेखा परीक्षकांकडून ताशेरेपाणी कराबाबत चंद्रपूर मनपाने सिंचन विभागाशी अद्याप करार न केल्याने करवसुलीचा प्रश्न वादग्रस्त झाला. गतवर्षी याच प्रश्नावरून औरंगाबाद येथील मुख्य जललेखा परीक्षकांनी कडक ताशेरे ओढले होते. शिवाय करार न करता मोघम पद्धतीने पाणी उचल करणाºया मनपाचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका