शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही.

ठळक मुद्देपाणीकर थकबाकी प्रकरण : सिंचन विभागाकडून वसुलीच्या नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर पालिकेकडून सिंचन विभागाशी करार न करताच इरई धरणातून पाण्याची उचल करत आहेत. हा करार केल्यास पाण्याची उचल केलेल्या रिडींगप्रमाणेच पाणीकर लागू करण्याबाबत सिंचन विभागाने अनेकदा नोटिसा पाठविल्या. मात्र, मनपाकडून याकडे कानाडोळा केले जात आहे. परिणामी, कराराअभावी मनपाला कोट्यवधींचा पाणीकर भुर्दंड बसत आहे.महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही. हा करार झाला असता तर धरणातून पाणी उचल केलेल्या प्रमाणानुसारच सिंचन विभागाला पाणीकर वसुल करावा लागतो. मात्र, सिंचन विभागाने अनेकदा नोटीसा पाठवूनही मनपाने या विभागाशी अद्याप करार केला नाही. त्यामुळे १२ महिन्यांत १२ दलघमी पाणी उचल झाल्याचे गृहित धरून सिंचन विभागाकडून कर आकारला जात आहे. सद्यस्थितीत महानगर पालिकेकडे ६ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे सिंचन विभागाकडून महापालिकेला थकबाकी जमा करण्याच्या नोटीसा पाठविल्या जातात. तर दुसरीकडे आम्ही एवढ्या पाण्याची उचल केली नाही, असा पवित्रा मनपाकडून घेतला जात आहे. परंतु, मूळ समस्या जैसे थे असूनही मनपाने करार करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाही. सिंचन विभागाने पाणीकर वसूल करण्याबाबत नोटीस जारी केल्यानंतर मनपाकडून प्रतिदावा केला जातो. त्यानंतर बैठका होतात मनपा प्रशासन काही रक्कम अदा करते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. करार न करण्याच्या कारणांबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, महापौर राखी कंचर्लावार यांना विचारले असता याबाबत आयुक्त माहिती देऊ शकतील, असे सांगितले.करार झाला असता तर...चंद्रपूर शहराला दरमहिन्याला पिण्याचे पाणी किती दलघमी लागते आणि धरणातून किती पाण्याची उचल होते, यासंदर्भात करारात स्पष्ट नमुद केले जाते. त्यासाठी पाणी उचल करण्याचे मीटर व अन्य तांत्रिक सामग्री करार करणाऱ्यांकडून लावली जाते. मात्र, मनपाने अशा प्रकाराचा सिंचन विभागासोबत असा करारच केला नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीवरून नोटीसा पाठविण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत.मुख्य लेखा परीक्षकांकडून ताशेरेपाणी कराबाबत चंद्रपूर मनपाने सिंचन विभागाशी अद्याप करार न केल्याने करवसुलीचा प्रश्न वादग्रस्त झाला. गतवर्षी याच प्रश्नावरून औरंगाबाद येथील मुख्य जललेखा परीक्षकांनी कडक ताशेरे ओढले होते. शिवाय करार न करता मोघम पद्धतीने पाणी उचल करणाºया मनपाचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका