शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वेकोलिच्या कोलस्टॉकमधील लाखोंचा कोळसा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:36 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसास्ती कोळसा खाण । १५ दिवसांपासून धगधगतेय आग, वेकोलिचे दुर्लक्ष

नितीन मुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोयेगाव याठिकाणी विविध कोळसा खाणी आहेत. मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन घेतले जाते व खाणीतून काढलेला कोळसा हा कोलस्टॉकवर साठविला जातो. साठविलेल्या या कोळशाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगी लागतात. त्यावर उपाय म्हणून पाणी शिंपडले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण करता येते.सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोलस्टॉवर मागील १५ दिवसांपासून अशीच आग धगधगत असून त्यावर नियंत्रण करण्यात वेकोलि प्रशासन अपयशी ठरत आहे.पाण्याची पातळी खालावलीकोळसा खाणीमुळे परिसरातील तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणाऱ्या धुरामुळे, अशा आगीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिसरातील सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी, साखरी गोयेगाव चार्ली, निर्ली, बाबापूर, मानाली, कढोली, माथरा, रामपूरसह इतर गावांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत या गावातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.सास्ती-गोवरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी नव्हत्या. त्या काळात उन्हाळ्यात नाल्यात पाणी राहत होते. आज जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. पूर्वीपेक्षा तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेकोलिच्या धुळीमुळे व कोळशाच्या आगीमुळे तापमान वाढले आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाची दाहकता जाणवत आहे. शेतात काम करणे कठीण होत आहे. जनावरांचेही हाल होत आहे.-भास्कर लोहे, जेष्ठ नागरिक, गोवरी

टॅग्स :fireआग