शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

झाडीतील हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; मजुरांचे जत्थे नागपूर, वर्धा, वाशिमकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:28 IST

Chandrapur : विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पुरेसे काम उपलब्ध नसल्याने झाडीपट्टीतील मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दिवाळीसाठी हे मजूर गावाकडे येत असले, तरी दिवाळीनंतर पुन्हा कामावर जात असल्याने यावर्षीच्या विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पूर्व विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होत असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही या तालुक्यांना झाडीपट्टी म्हणून संबोधण्यात येते. झाडीपट्टीतील मुख्य आणि एकमेव पीक धानाचे असून, याच एका पिकावर झाडीपट्टीची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. मात्र, हे धान पीक झाडीपट्टीतील मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने झाडीपट्टीतील मजूर दरवर्षीच रोजगारासाठी चापळीत म्हणजे नागपूर जिल्ह्यात स्थलांतर करीत असतात. काही मजुरांचे जत्थे तर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत जातात, अशी माहिती आहे. 

उलट वरील जिल्ह्यात बहुपीक पद्धती रूढ आहे. या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मिरची, धान यांसारखे विविध पीक घेतले जातात. मात्र, तेथे उपलब्ध असलेल्या पीक व शेतीनुसार मजूर उपलब्ध होत नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षीच झाडीतील मजुरांना कामासाठी बोलवत असतात. 

सध्या सोयाबीन काढण्याचे काम सुरू झाले. सोयाबीन सवंगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याने अनेक मोठे शेतकरी ओळखीच्या मजुरांकडे निरोप देऊन गेले. या निरोपांवरून नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील शेकडो मजूर उमरेड, भिवापूर तालुक्यात सोयाबीन सवंगण्यासाठी रवाना झाले आहेत. कापूस आणि मिरचीचा हंगाम सुरू झाला की, असेच मजूर या हंगामासाठी नेहमीच जात असल्याचे दिसून येते. 

वाहनांचीही सोय ज्या मजुरांना मुक्कामी राहणे शक्य नाही, अशा मजुरांसाठी वाहनांचीही सोय करण्यात येत आहे. हे मजूर या वाहनांनी ये-जा करीत आहेत. काही गावांत, तर मजुरांची ने-आण करणारी वाहनेच तयार झाली हे शक्यतो भिवापूर, उमरेड तालुक्यापर्यंत मजुरीसाठी जात असतात.

मतदानावर पडणार फरक रोजगारासाठी स्थलांतर केलेले हे मजूर दिवाळीसाठी घरी येत असतात. मात्र दिवाळी झाली की, पुन्हा त्यांचे स्थलांतर सुरु होते. यावेळी स्थलांतराची गती थोडी अधिक असते, जे आहेत, तेही शतकारी स्वतःच्या अलापधारका आज ही रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात.

अपघात होतात तरीही... मजुरांची ने ने-आण करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहेत. सात महिन्यांपूर्वी उमरेड तालुक्यात झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील माहेर येथील ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर याच आठवड्यात नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथील एक महिला ठार, तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. अशा घटना डोळ्यादेखत घडूनही पोटाची खळगी भरण्यासाठी अशी जोखीम पत्करावी लागत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणchandrapur-acचंद्रपूर