शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

एमआयडीसीतील उद्योगांना महागाईचा फटका

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल

चंद्रपूर : शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल दीडशेंवर उद्योग बंद झाल्याची माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत दिली.चंद्रपूर जिल्ह्यात आणि शहरात मागील दोन वर्षात उद्योगांचा विकास नगण्य झाला आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष, वीज दरवाढ आणि कोळशाचा अपुरा पुरवठा यासह प्रदूषणाचे कारण पुढे करून जिल्ह्यात नवीन उद्योगांना असलेली बंदी यामुळे औद्योगिक विकास खुंटला आहे. याचा फटका जुन्या उद्योगांना बसत असून अनेक उद्योग बंद झाले आहेत तर, काही उद्योजकांवर सुरू असलेले उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. एमआयडीसीमध्ये सुरुवातीला २३५ उद्योग सुरू झाले होते. मात्र, नंतरच्या काळात दीडशेंवर उद्योग बंद झाले असून आजमितीस केवळ ८० उद्योग सुरू आहेत. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकास वाढीला प्रोत्साहन देण्याची गरज असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय विधानसभा, लोकसभेत रेटावा अशी मागणी रुंगठा यांनी केली.शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रीस इंडस्ट्रीज, चमन मॅटेलिक, कोल वॉशरिज यासारखे मोठे उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे हजारावर युवकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ताडाळी एमआयडीसी येथे नवीन उर्जा प्लांट उभारण्यात आला आहे. परंतु थर्मल पॉवर स्टेशनचे पीपीए न झाल्यामुळे ऊर्जा निर्मिती प्लांट बंद पडत आहेत. मूल एमआयडीसीतील उद्योगधंदेही बंद होत आहेत. अशावेळी जिल्ह्यातील उद्योगवाढीला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या विदर्भातील नागपूरनंतर दुसरे महत्त्वाचे शहर आहे. विदर्भातील सर्वाधिक महसूल देणारे शहर असून कोळसा खाणी, जंगल, पाणी व अन्य खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमाजवळ असल्याने या राज्यातील उद्योजकांना चंद्रपूर येथे विविध उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करता येणार आहे.मात्र, राज्यशासन जिल्ह्यातील उद्योगधोरणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप रुंगठा यांनी केला. यावेळी श्याम कुंदोजवार, प्रदीप बुक्कावार, राजेंद्र चौबल, शेख रहेमान पटेल आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)